शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादीचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:49 IST

मतविभाजनाची दोघांनाही भीती । काठावरचे मतदार ठरविणार निर्णायक भूमिका

३० वर्षांपासून शिवसेनेचा गड असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी ताकदीने चढाई केली असून, हा गढ ताब्यात घेण्यासाठी प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जोरदार धक्के देण्याचे काम आघाडीचे नेते करीत आहेत़

शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळून देण्याची किमया साधणाऱ्या परभणी लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा संजय जाधव शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत तर गेल्या चार निवडणुकांमध्ये सातत्याने सेनेकडून पराभव स्वीकारणाºया राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी राजेश विटेकर निवडणूक लढवित आहेत़ आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा यावेळची निवडणूक शिवसेनेची कठीण परीक्षा घेणारी ठरत आहे़ महायुती असली तरी उमेदवार संजय जाधव प्रचाराच्या मैदानात मात्र एकटेच उतरल्याचे दिसून येत आहे़ त्यांना शिवसेना आणि भाजपातील काही नेत्यांकडून अद्यापही म्हणावी तशी साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे मुंबईतील सेना नेत्यांची परभणीत ये-जा वाढली आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात आघाडीच्या नेत्यांची फौज उतरली असून, त्यांच्याकडून ताकदीने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे़ माजी खा़ गणेश दुधगावकर हे मात्र पक्षाच्या प्रचारात कुठेही दिसून येत नाहीत़ गेल्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काठावरच्या आणि नव मतदारांमुळे पराभव झालेला आहे़ त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर राहू नये, या दृष्टीकोणातून राष्ट्रवादीकडून नव मतदारांच्या संपर्कासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे़ यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे़ शिवाय शैक्षणिक संस्थांचे माध्यमही या कामी वापरले जात आहे़

या दोन्ही उमेदवारांच्या स्पर्धेत वचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खानही उतरल्याने तिरंगी लढतीत मतविभाजनाची भीती दोन्ही पक्षांना वाटू लागली आहे़ त्यामुळे पडद्यामागे हालचाली करून आपल्या मतपेटीला वंचित आघाडीचा कमी फटका कसा बसेल? याची काळजी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून घेतली जात आहे़ शिवाय स्पर्धकाच्या व्होट बँकेला सुरूंग लावू शकतील अशा बºयापैकी मते घेणाºया इतर उमेदवारांनाही पाठबळ देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून सुरू आहे़परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेना मजबूत स्थितीत असून, पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी देशपातळीवर केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास दृढ झाला आहे़ शिवाय मित्र पक्षांची मोलाची साथ मिळत असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित आहे़- संजय जाधव, शिवसेनाशिवसेना खासदारांच्या कार्य पद्धतीला जनता कंटाळली असून, धार्मिक व भावनिक मुद्यांना थारा न देता जनतेला विकास हवा आहे़ त्यामुळे वडीलधारी मंडळी, तरुण, माता भगिनी या सर्वांचा आपणाला प्रतिसाद मिळत असल्याने परभणी मतदार संघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास घडवेल़- राजेश विटेकर, राष्ट्रवादी

टॅग्स :parbhani-pcपरभणी