शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

जिल्ह्यात दीड महिन्यांत ६५ जणांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा ...

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३५ जणांचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरोग्य विभागाने तपासण्या जवळपास तिपटीने वाढविल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही तेवढीच होत आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही त्याच तुलनेने वाढले आहे. मागील कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी होती. परंतु, या टप्प्यात खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. १५ फेब्रुवारीपासून ते २७ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३० रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असून, ३५ रुग्णांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र फेब्रुवारीमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसांआड एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु, मागच्या ५ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. मागच्या ५ दिवसांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला.

उपचारापूर्वी मृत्यूचे प्रमाण नगण्य

कोरेाना रुग्णाला उपचार मिळण्यापूर्वीच किंवा त्यास दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या नोंदी जिल्ह्यात नाहीत. हे प्रमाण तसे शून्य आहे. शासकीय पातळीवर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात उपचारापूर्वी किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

आतापर्यंत ९२ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९२ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाल्याची नोंद आहे.

त्याचप्रमाणे ८७ रुग्णांचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांनी, ७७ रुग्णांचा मृत्यू चार ते सात दिवसांनी, ५९ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांनी तर ४३ रुग्णांचा मृत्यू १४ दिवसांनी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.