शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
3
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
4
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
5
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
6
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
7
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
8
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
9
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
11
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
12
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
13
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
14
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
15
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
16
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
17
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
18
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
19
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
20
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दीड महिन्यांत ६५ जणांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा ...

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३५ जणांचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरोग्य विभागाने तपासण्या जवळपास तिपटीने वाढविल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही तेवढीच होत आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही त्याच तुलनेने वाढले आहे. मागील कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी होती. परंतु, या टप्प्यात खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. १५ फेब्रुवारीपासून ते २७ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३० रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असून, ३५ रुग्णांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र फेब्रुवारीमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसांआड एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु, मागच्या ५ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. मागच्या ५ दिवसांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला.

उपचारापूर्वी मृत्यूचे प्रमाण नगण्य

कोरेाना रुग्णाला उपचार मिळण्यापूर्वीच किंवा त्यास दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या नोंदी जिल्ह्यात नाहीत. हे प्रमाण तसे शून्य आहे. शासकीय पातळीवर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात उपचारापूर्वी किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

आतापर्यंत ९२ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९२ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाल्याची नोंद आहे.

त्याचप्रमाणे ८७ रुग्णांचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांनी, ७७ रुग्णांचा मृत्यू चार ते सात दिवसांनी, ५९ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांनी तर ४३ रुग्णांचा मृत्यू १४ दिवसांनी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.