शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

एमआयडीसी प्रकल्प अर्धवट तर १३२ केव्हीची मंजुरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST

देवगावफाटा: सेलू तालुक्याच्या विकासात भर घालणारा हादगाव पावडे परिसरातील एमआयडीसी प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. तर दुसरीकडे मंजूर झालेले १३२ ...

देवगावफाटा: सेलू तालुक्याच्या विकासात भर घालणारा हादगाव पावडे परिसरातील एमआयडीसी प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. तर दुसरीकडे मंजूर झालेले १३२ केव्ही वीज केंद्र रद्द करण्यात आले. याशिवाय मेहकर ते पंढरपूर हा सेलूमार्गे जाणारा रस्ता वाटूरफाटा मार्गाने पळविण्यात आला. त्यामुळे विकासाला छेद देणाऱ्या या बाबींकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे. सेलू तालुक्यातील हादगाव पावडे शिवारातील २४५.८१हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर हादगाव खु.,पिंप्रुळा, रवळगाव या शिवारातील प्रस्तावित जमिनीची भूमिअभिलेख कार्यालयाकडून एक वर्षापूर्वी मोजणीही पूर्ण करण्यात आली; परंतु, शेत जमिनीवरील झाडे,विहिरी, पाईपलाईनच्या नोंदीवरुन भूमिअभिलेख कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या दोन कार्यालयांमध्ये समन्वय झाला नाही. परिणामी जमीन मोजणी अहवाल अनेक महिने अडकून पडला होता. अखेर जमीन मोजणीचा संयुक्त अहवाल संबंधित विभागाकडे सुपुर्द करण्यात आला. मात्र शेत जमिनीच्या दराचा घोळ अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी हादगाव पावडे परिसरात १३२ केव्हीचे वीज केंद्र मंजूर करण्यात आले.विशेष म्हणजे भूमिपूजन सोहळाही पार पडला. मात्र त्यानंतर हा प्रकल्प वरिष्ठ स्तरावरुन रद्द करण्यात आला. याबाबत ना लोकप्रतिनिधी, ना नागरिक, ना प्रशासनाने आवाज उठविला. हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे आजही सेलू तालुक्यातील ९ ठिकाणच्या ३३ केव्ही उपकेंद्रांना पाथरी, परतूर व जिंतूर येथून वीज पुरवठा घ्यावा लागतो, हे सेलूकरांचे दुर्दैव आहे. एकंदरीत सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक बाबत प्रगतशील असणाऱ्या सेलू तालुक्याच्या विकासात भर घालणारे अनेक प्रकल्प रद्द झाले आहेत. काही अर्धवट अवस्थेत तर काही पळवून नेले आहेत. याकडे सेलूकरांचे दुर्लक्ष झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग पळविला

दळणवळणाच्या दृष्टीने मेहकर ते पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग सेलू- पाथरीमार्गे मंजूर झाला. मात्र राजकीय सारीपाटाच्या खेळात हा मार्ग सेलू, पाथरी ऐवजी जालना जिल्ह्यातील वाटूरफाटामार्गे वळविण्यात आला. याबाबत अद्याप एकानेही आवाज उठविला नाही, हेही आश्चर्यच आहे. त्यामुळे याकडे सेलूकरांनी एकजुटीचे लक्ष देऊन सेलूच्या विकासात भर घालणाऱ्या प्रकल्पांसाठी आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे.