शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुरुंबा परिसरातील साडेतीन हजार कुक्कुट पक्ष्यांना दयामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:15 IST

परभणी : तालुक्यातील मुरुंबा परिसरात बर्ड फ्लूने कोंबड्या दगावल्याच्या घटनेनंतर बुधवारी या परिसरातील ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांना दयामरण ...

परभणी : तालुक्यातील मुरुंबा परिसरात बर्ड फ्लूने कोंबड्या दगावल्याच्या घटनेनंतर बुधवारी या परिसरातील ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात ही प्रक्रिया पूर्ण केली.

तालुक्यातील मुरुंबा परिसरातील ८०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत्यू पावल्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या भागातील बर्ड फ्लूचा प्रसार इतर भागात होऊ नये, यासाठी उपाययोजना केली. सुरुवातील मुरुंबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला. त्यानंतर येथील कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग (नष्ट) करण्याच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश काढले. त्यानुसार प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ए.बी. लोणे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजेसाब कल्लेपुरे, डॉ. शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे, डॉ. पी.आर. पाटील यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील १०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे पथक १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गावात दाखल झाले. मुरुंबा परिसरातील कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यासाठी १,२६५ किलो खाद्य वापरण्यात आले. त्यानंतर दयामरण दिलेल्या ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने २ बाय २ बाय ७ फूट खोल खड्डे करून त्यात या पक्ष्यांचे डिस्पोजेबल करण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.