शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी/सेलू : राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़२३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली़ तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सभा पार पडली़या दोन्ही सभांना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, चित्राताई वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, बसवराज पाटील, आ़सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ़प्रदीप नाईक, आ़जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ़बाबाजानी दुर्राणी, आ़विजय भांबळे, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, आ़शशिकांत शिंदे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अजिंक्य राणा पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, माजी खा़ सुरेश जाधव, संग्राम कोते, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आ़ व्यंकटराव कदम, दशरथ सूर्यवंशी, सारंगधर महाराज, डॉ़ संजय रोडगे, जि़प़ सभापती अशोक काकडे, गटनेते अजय चौधरी, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, नानासाहेब राऊत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती़पवार म्हणाले, राज्यातील सरकार सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे़ समाजासमाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ बेरोजगारी वाढली आहे़ पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळण्याऐवजी विमा कंपनीच्याच घशात १४ हजार कोटी रुपये घातले़ त्यामुळेक शेतकरी अस्वस्थ आहेत़ जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला़कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस खात्याचाही पूर्वीप्रमाणे दरारा राहिला नाही़ बंदोबस्त करायचा सोडून पोलीस आमच्या सभा व रॅलीचे शुटींग करण्यात मग्न आहेत़ एका पोलीस कर्मचाºयाची पत्नीच चोरांच्या टोळीत सापडली़ तिच्याकडे दोन कोटींचे घबाड सापडले़ यावरून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसून येते़ थेट सरपंच निवडीच्या निर्णयावरही टीका करीत केवळ पैशावाल्या लोकांसाठी निर्णय झाल्याचे ते म्हणाले़ भाजपचे सरकार कायदे व नियम बदलत असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितले़पाथरीतील सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, जुनेद खान दुर्राणी, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, चक्रधर उगले, अनिल पाटील, सुनील उन्हाळे, मोईज अन्सारी, हतीम अन्सारी, राजेश ढगे, रमेश तांगडे, हन्नानखान दुर्राणी, राजीव पामे, नितेश भोरे, अलोक चौधरी आदींनी प्रयत्न केले़शिवसेनेची अवस्था केविलवाणी४अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवरही निशाणा साधला़ शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी असते़ शिवसेनापूर्वी वाघासारखी होती़ परंतु, आता शेळी, ससाही नाही तर कासव झाली आहे़सरकार झोपेतच- मुंडे४विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टिका केली़ महाराष्ट्र सरकार हे रामदेव बाबाचे सरकार झाले आहे़ पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत़ महागाई वाढत आहे़ जनता त्रस्त असताना सरकार मात्र झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला़