शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी/सेलू : राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़२३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली़ तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सभा पार पडली़या दोन्ही सभांना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, चित्राताई वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, बसवराज पाटील, आ़सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ़प्रदीप नाईक, आ़जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ़बाबाजानी दुर्राणी, आ़विजय भांबळे, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, आ़शशिकांत शिंदे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अजिंक्य राणा पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, माजी खा़ सुरेश जाधव, संग्राम कोते, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आ़ व्यंकटराव कदम, दशरथ सूर्यवंशी, सारंगधर महाराज, डॉ़ संजय रोडगे, जि़प़ सभापती अशोक काकडे, गटनेते अजय चौधरी, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, नानासाहेब राऊत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती़पवार म्हणाले, राज्यातील सरकार सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे़ समाजासमाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ बेरोजगारी वाढली आहे़ पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळण्याऐवजी विमा कंपनीच्याच घशात १४ हजार कोटी रुपये घातले़ त्यामुळेक शेतकरी अस्वस्थ आहेत़ जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला़कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस खात्याचाही पूर्वीप्रमाणे दरारा राहिला नाही़ बंदोबस्त करायचा सोडून पोलीस आमच्या सभा व रॅलीचे शुटींग करण्यात मग्न आहेत़ एका पोलीस कर्मचाºयाची पत्नीच चोरांच्या टोळीत सापडली़ तिच्याकडे दोन कोटींचे घबाड सापडले़ यावरून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसून येते़ थेट सरपंच निवडीच्या निर्णयावरही टीका करीत केवळ पैशावाल्या लोकांसाठी निर्णय झाल्याचे ते म्हणाले़ भाजपचे सरकार कायदे व नियम बदलत असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितले़पाथरीतील सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, जुनेद खान दुर्राणी, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, चक्रधर उगले, अनिल पाटील, सुनील उन्हाळे, मोईज अन्सारी, हतीम अन्सारी, राजेश ढगे, रमेश तांगडे, हन्नानखान दुर्राणी, राजीव पामे, नितेश भोरे, अलोक चौधरी आदींनी प्रयत्न केले़शिवसेनेची अवस्था केविलवाणी४अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवरही निशाणा साधला़ शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी असते़ शिवसेनापूर्वी वाघासारखी होती़ परंतु, आता शेळी, ससाही नाही तर कासव झाली आहे़सरकार झोपेतच- मुंडे४विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टिका केली़ महाराष्ट्र सरकार हे रामदेव बाबाचे सरकार झाले आहे़ पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत़ महागाई वाढत आहे़ जनता त्रस्त असताना सरकार मात्र झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला़