शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी/सेलू : राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़२३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली़ तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सभा पार पडली़या दोन्ही सभांना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, चित्राताई वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, बसवराज पाटील, आ़सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ़प्रदीप नाईक, आ़जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ़बाबाजानी दुर्राणी, आ़विजय भांबळे, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, आ़शशिकांत शिंदे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अजिंक्य राणा पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, माजी खा़ सुरेश जाधव, संग्राम कोते, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आ़ व्यंकटराव कदम, दशरथ सूर्यवंशी, सारंगधर महाराज, डॉ़ संजय रोडगे, जि़प़ सभापती अशोक काकडे, गटनेते अजय चौधरी, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, नानासाहेब राऊत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती़पवार म्हणाले, राज्यातील सरकार सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे़ समाजासमाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ बेरोजगारी वाढली आहे़ पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळण्याऐवजी विमा कंपनीच्याच घशात १४ हजार कोटी रुपये घातले़ त्यामुळेक शेतकरी अस्वस्थ आहेत़ जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला़कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस खात्याचाही पूर्वीप्रमाणे दरारा राहिला नाही़ बंदोबस्त करायचा सोडून पोलीस आमच्या सभा व रॅलीचे शुटींग करण्यात मग्न आहेत़ एका पोलीस कर्मचाºयाची पत्नीच चोरांच्या टोळीत सापडली़ तिच्याकडे दोन कोटींचे घबाड सापडले़ यावरून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसून येते़ थेट सरपंच निवडीच्या निर्णयावरही टीका करीत केवळ पैशावाल्या लोकांसाठी निर्णय झाल्याचे ते म्हणाले़ भाजपचे सरकार कायदे व नियम बदलत असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितले़पाथरीतील सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, जुनेद खान दुर्राणी, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, चक्रधर उगले, अनिल पाटील, सुनील उन्हाळे, मोईज अन्सारी, हतीम अन्सारी, राजेश ढगे, रमेश तांगडे, हन्नानखान दुर्राणी, राजीव पामे, नितेश भोरे, अलोक चौधरी आदींनी प्रयत्न केले़शिवसेनेची अवस्था केविलवाणी४अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवरही निशाणा साधला़ शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी असते़ शिवसेनापूर्वी वाघासारखी होती़ परंतु, आता शेळी, ससाही नाही तर कासव झाली आहे़सरकार झोपेतच- मुंडे४विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टिका केली़ महाराष्ट्र सरकार हे रामदेव बाबाचे सरकार झाले आहे़ पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत़ महागाई वाढत आहे़ जनता त्रस्त असताना सरकार मात्र झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला़