शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी येथे कार्यकर्ता मेळावा : मनसे युवकांना योग्य न्याय देईल- राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:50 IST

राजकीय पक्षांकडून युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ त्यामुळे युवकांनी हे ओळखले पाहिजे़ महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी युवकांनी मनसेत दाखल व्हावे़ योग्य कार्यकर्त्याची दृष्टी पाहून त्याला निश्चित संधी दिली जाईल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राजकीय पक्षांकडून युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ त्यामुळे युवकांनी हे ओळखले पाहिजे़ महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी युवकांनी मनसेत दाखल व्हावे़ योग्य कार्यकर्त्याची दृष्टी पाहून त्याला निश्चित संधी दिली जाईल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले़परभणी शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते़ यावेळी मनसेचे अभिजीत पानसे, राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अशोक तावडे आदींची व्यासपीठावर उपस्थित होती. राज ठाकरे म्हणाले, राज्यातील परिस्थिती बिकट आहे़ युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ या युवकांना योग्य दिशा देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे़ ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची तडफ आहे़ त्यांनी मनसेत दाखल व्हावे, कार्यकर्त्यांची वज्रमूठ बनवून समाजकारण करण्यासाठी मनसेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत़, असे ते म्हणाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, शेख राज, गणेश सुरवसे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सेलूत शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटनसेलू- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते २३ जुलै रोजी शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले़ दरम्यान, राज ठाकरे यांनी संवाद न साधल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला़ विद्यानगर येथील जनता सेवा केंद्रातील गणेश भिसे यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले़ यावेळी शेख राज, गणेश भिसे, निजलिंगआप्पा तरवडगे, गणेश निवळकर, गुलाबराव रोडगे, गणेशराव बोराडे, शंकर लिंगायत, राजाभाऊ मोगल आदींची उपस्थिती होती़ मनसेने पर्यावरण बचाव मोहिमेंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी १ लाख सिडबॉम्ब पेरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ या उपक्रमाची माहितीही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतली़ त्यानंतर रायगड कॉर्नर येथे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी आयोजित केलेला फराळ वाटप कार्यक्रम ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला़ यावेळी युवक मोठ्या संख्येने जमा झाले होते़ मात्र राज ठाकरे यांनी स्वागत स्वीकारून प्रातिनिधीक स्वरुपात फराळ वाटप करून युवकांशी संवाद न साधताच परभणीच्या दिशेने रवाना झाले़ त्यामुळे उपस्थितांचा हिरमोड झाला़

टॅग्स :parabhaniपरभणीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे