शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

बाजारपेठा बंद; वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. ...

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळपासून बाजारपेठ बंद राहिली. येथील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, गांधी पार्क, नानलपेठ परिसर, सराफा बाजार या भागात दिवस शुकशुकाट निर्माण झाला होता. संचारबंदीला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी प्रत्यक्षात गुरुवारी बाजारपेठेतील एकही दुकान सुरू नव्हते.

संचारबंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प राहिली. जिल्ह्यात छोटे-मोठ्या व्यावसायिकांकडून साधारणता दररोज ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून मजुरांना रोजगारही मिळतो. मात्र बाजारपेठ बंद राहिल्याने ही उलाढाल ठप्प राहिली आहे.

संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र असे असताना अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवरून फिरत असल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वर्दळ सुरू होती. हे वाहनधारक अत्यावश्यक सेवेतील आहेत का? ते का? फिरतात याबाबत प्रशासनाकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गुरुवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठा कडकडीत बंद आणि आणि रस्त्यांवरील वर्दळ सुरू, अशी स्थिती होती.

संचारबंदीमुळे गर्दीवर नियंत्रण संचारबंदी लागू केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले असून, विविध हॉटेल्स, चहा स्टॉल्स आणि पानटपऱ्यांवर विनाकारण होणारी गर्दी बंद झाली आहे. तसेच बाजारपेठेतही सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास होणारी गर्दी गुरुवारी दिसली नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसून आले.