शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

परभणीत व्यापाºयांचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:58 IST

महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.एलबीटीच्या थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपाला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशनरोडमार्गे हा मोर्चा विसावा चौकात आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापाºयांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापाºयांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापाºयांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तात्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा दिल्या. त्यानंतर हा मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापाºयांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली.यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे यांच्यासह इतर व्यापाºयांनी संताप व्यक्त करीत भूमिका मांडली. व्यापाºयांनी महामार्गावरच बस्तान मांडल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. परभणी- वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्यानंतर व्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापाºयांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापाºयांच्या पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त रेखावार यांच्या कक्षामध्ये जाऊन त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापाºयांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांसह २०० ते ३०० व्यापारी सहभागी झाले होते.पोलिसांच्या भूमिकेमुळे व्यापारी संतापलेमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर व्यापाºयांनी रास्तारोको सुरु केला. त्यावेळी पोलीस अधिकाºयांनी मोर्चेकºयांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. यावेळी व्यापारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर व्यापारी मनपात जात असताना क्यूआरटीच्या काही अतिउत्साही पोलीस कर्मचाºयांनी आडमुठी भूमिका घेतल्याने व्यापाºयांनी संताप व्यक्त केला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी काही पोलीस कर्मचाºयांना चांगलेच सुनावले. त्यानंतर या पोलीस कर्मचाºयांनी नरमाईची भूमिका घेतली.