शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परभणीत हमालांपाठोपाठ व्यापाºयांच्या बंदमुळे मोंढा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:43 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकºयांचा कृषीमाल व्यापारी खरेदी करतात़ या परिसरात असलेल्या हमाल कामगारांनी २२ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे़ परभणी जिल्ह्यात माथाडी बोर्ड स्थापन झाले असून, माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल संपावर गेले आहेत़ तर माथाडी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारपासून मोंढ्यातील व्यापाºयांनीही बेमुदत बंद पुकारला आहे़ त्यामुळे आठ दिवसांपासून येथील व्यवहार पूर्णत: ठप्प झाला आहे़ माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हमाल मापाडी कामगारांनी मोंढा परिसरातून सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोर्चा काढला़ कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा नवा मोंढा, गव्हाणे चौक, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन हमाल कामगारांनी आपली मागणी पुन्हा एकदा रेटून धरली आहे़ हमाल कामगारांनी बंद पुकारल्याने मोंढा बाजारपेठेबरोबरच जिनिंग प्रेसिंग आणि एमआयडीसीतील आॅईलमिल व इतर कारखान्यांवर परिणाम झाला आहे़ दुसरीकडे मोंढ्यातील व्यापाºयांनी देखील सोमवारी सकाळपासूनच बंद पुकारला़ त्यामुळे मोंढा बाजारपेठेतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीट बंद ठेवण्यात आली़ व्यापाºयांनी सकाळी बाजारपेठ परिसरातून पदयात्रा काढून आपली मागणी लावून धरली़ तत्पूर्वी बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांना व्यापाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे़व्यापाºयांच्या बंदमुळे पाच दिवसापर्यंत काही प्रमाणात असलेली मोंढ्यातील उलाढाल सोमवारी पूर्णत: ठप्प झालीे़सध्या कापूस, सोयाबीन, विक्रीला आला आहे़ मात्र संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने शेतकºयांना कृषीमाल विक्रीसाठी आता अडचणींचा सामना करावा लागत आहे़