शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Vidhan Sabha 2019 : नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे अन् धंदा फसवणुकीचा; शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:21 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबतही असेच खोटे आश्वासन दिलं गेलं आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षे मंत्री केलं तेव्हा काय केले?

परभणी : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनविण्याचे आश्वासन दिले़ प्रधानमंत्र्यांना बोलावून आज तीन वर्षे झाली़ तिथं काहीही झालेलं नाही़ वाटलं तर बघा जाऊन, समुद्रात काही दिसतयं का? नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे घ्यायचं आणि धंदा फसवणुकीचा करायचा, असा प्रकार या लबाड राजकर्त्यांनी सुरू केला आहे़ त्यामुळे आता जनता सुज्ञ झाली असून, त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना केले़

परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते़ यावेळी खा़ पवार बोलत होते़ व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ रामराव वडकुते, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, प्रदीप सोळंके आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आज नाशिक येथे पंतप्रधानांची सभा होती़ तेथील विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या गेल्या़ काहींना अटक केली गेली़ शेतकरी संकटात आहेत तरीही बाजारात कांदा आणायचा नाही म्हणून तेथील शेतकऱ्यांना सांगितले गेले़ शेतकऱ्यांची एवढी भीती त्यांना का वाटावी? मी चौकशी केली, कांद्याचे भाव कोसळल्याने येथील शेतकरी पंतप्रधानांच्या वाहनावर कांदे फेकतील म्हणून असे आदेश काढल्याचे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले़ कांद्याचे भाव कोसळण्यास कोण जबाबदार आहे? पाकिस्तानचा कांदा भारतात का आणला? भारतातला कांदा चालत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले, तेथे शेतकऱ्यांना तुरूंगात टाकण्यात आले, आता स्वाभिमानाची भावना असलेला प्रत्येक जण हा अन्याय सहन करणार नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारला सत्तेतून हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईतील अरबी समुद्रात देशाला अभिमान वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे सरकारने घोषित केले़ पंतप्रधानांना तेथे बोलावून तीन वर्षे झाले, कोणी मुंबईला गेलंय का, बघा त्या समुद्रात काही दिसतयं का? कशाचा काय पत्ता नाही़ नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचं घ्यायचं आणि धंदा मात्र फसवणुकीचा करायचा, असं हे राज्यातील भाजपा सरकार आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबतही असेच खोटे आश्वासन दिलं गेलं आहे, असेही खा़ पवार म्हणाले़. भाजपावर टीका करताना ते म्हणाले, तुमच्याकडे संपत्तीचा डोंगर असेल; परंतु, माझ्याकडे तरुण पिढीचा समुद्र आहे आणि या तरुण पिढीच्या समुद्रात तुमचा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे़ त्यामुळे आता हे तरुणच तुम्हाला सत्तेतून घालवतील, असेही ते म्हणाले़ यावेळी आ़ धनंजय मुंडे, आ़ दुर्राणी, आ़ भांबळे, आ़ केंद्रे यांची भाषणे झाली़

१५ वर्षे मंत्री केलं तेव्हा काय केले?जे सोडून गेले त्यांची मला चिंता नाही़ १९८० मध्ये ६० आमदार निवडून आणले़ विदेश दौऱ्यावर गेलो आणि आठ दिवसातच  ५२ आमदार पक्ष सोडून गेले़ जाऊ द्या म्हणालो़ नव्याने निवडणूक लागली़ ५२ पैकी एकही आमदार निवडून आला नाही़ आता ही सोडून जाणारे पवार साहेब आमच्या हृदयात आहेत असे सांगत आहेत़ तुमचं हृदय केवढं (मिश्कीलपणे) आणि मी केवढा़ मी तुमच्या हृदयात कसा मावणार? म्हणताहेत विकास करायचा म्हणून सोडून जातोय, मग तुम्हाला १५ वर्षे मंत्री केलं त्या काळात काय केलात़़ असेही शरद पवार म्हणाले़ जााणाऱ्या लोकांवर भरोसा ठेवू नका़ आजचे तरुण खूप हुशार आहेत़ ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019