शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Maharashtra Election 2019 :लेंडी नदीला पूर आल्याने मतदारांना करावी लागत आहे कसरत; १२ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 16:03 IST

Maharashtra Election 2019 : मतदानाच्या दिवशीच गावांचा संपर्क तुटल्याने गैरसोय

परभणी : पालम तालुक्यात सोमवारी (दि.२१ ) दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहराजवळील लेंडी नदीला पूर आला. यामुळे आल्याने ऐन मतदानाच्या दिवशी 12 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक मतदार पुरामध्ये अडकून पडले आहेत. 

शहराजवळील लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा पूल  12 गावांतील ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पालम तालुक्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे परिसरातील नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास लेंडी नदीला मोठा पूर आला. येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने या १२ गावांचा संपर्क शहरापासून तुटला आहे. तसेच पुराचे पाणी वाढत जात असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे.

पुरामुळे मतदानाच्या दिवशीच फळा, आरखेड, सोमेश्वर घोडा, उमरथडी  या गावांचा संपर्क तुटला. तर याच नदीवर पालम ते पूयणी रस्त्यावरही पुराचे पाणी आले आहे. यामुळे पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर  या गावांचा संपर्क तुटला आहे. गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना मोठी गैरसोय होत आहे. तसेच मतदानाचा दिवस असल्याने गावाबाहेर गेलेल्या मतदारांना मतदानासाठी गावात येताना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांना वाहने घेऊन शिरपूर सायाळा मार्गे गाव गाठावे लागले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीgangakhed-acगंगाखेड