शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामाच्या गुणवत्तेला कंत्राटदारांकडून खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

गंगाखेड ते परभणी राज्य मार्ग २४८ ला जोडण्यासाठी तालुक्यातील भांबरवाडी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेड व दुस्सलगावाला जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ...

गंगाखेड ते परभणी राज्य मार्ग २४८ ला जोडण्यासाठी तालुक्यातील भांबरवाडी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेड व दुस्सलगावाला जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरुवात करण्यात आली. यात नागठाणा पाटी, सुनेगाव ते मुळीमार्गे धारखेडला जोडणाऱ्या अंदाजे १० किलोमीटरच्या रस्त्याला ४ कोटी ८९ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाला १६ मे २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली. हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण करण्याची कंत्राटदाराला मुदत देण्यात आली, तसेच याच राज्य मार्गावरील भांबरवाडी गावाला जोडणाऱ्या अंदाजे २ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ३८ लाख ११ हजार व दुस्सलगाव या गावाला जोडणाऱ्या अंदाजे दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाला ९८ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. ३ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही रस्त्याचे काम २ मे २०२० रोजी पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असतानासुद्धा आजही या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यात मुख्य म्हणजे गंगाखेड-परभणी रस्त्यावरील नागठाणा पाटी, सुनेगावमार्गे मुळी, धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निविदेत समाविष्ट असलेल्या बांधकाम साहित्याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे, तसेच साइड पट्ट्यांमध्ये टाकलेल्या मुरमासह काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील कामांची गुणवत्ता तपासणीसाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुकावासीयांतून होत आहे.

रस्त्याच्या कामाबरोबर पुलाचे कामही निकृष्ट

नागठाणा पाटी ते सुनेगावदरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीला पावसाळ्यात थोडासा पाऊस झाला तरी या नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. मात्र, या रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या पुलाची कसल्याही प्रकारची उंची न वाढविता पुलावर सिमेंट रस्ता तयार केल्याचे पाहावयास मिळत आहे. आगामी पावसाळ्यात पावसाचे थोडेसे पाणी आले तरीही सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांचा गंगाखेड ते परभणी मुख्य राज्य मार्गाशी संपर्क तुटणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. पुलाची उंची न वाढविता पुलावरील रस्ता करण्याचा फायदा काय, असा सवाल या भागातील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.