शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही ...

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असून, आता मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने अजूनही सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थी घरीच बसून आहेत. सकाळी उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी घरी आल्यानंतर जेवण, सायंकाळच्या सुमारास मैदानावर जाऊन खेळणे, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा नित्यक्रम पार बिघडून गेला आहे. ऑनलाईनच्या निमित्ताने मोबाईल हातात आल्याने दिवसभर मोबाईल, टिव्ही आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत शारीरिक हालचालीच राहिल्या नाहीत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम वजन वाढण्यावर झाला आहे. ही समस्या आता जवळपास अनेक पालकांना सतावत आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या वेळेचे नियोजन करून देत त्यांच्या आहाराकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांनी हे करावे...

मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. नियमित सकाळी लवकर उठावे, रात्री लवकर झोपावे. शारीरिक हालचाली करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत मैदानी खेळ खेळावेत. जेवणाच्या वेळा ठरवून त्याच वेळी जेवण करावे. मोबाईल, टिव्ही पाहण्याच्या वेळा निश्चित कराव्यात.

मुलांनी हे करू नये...

मोबाईल, टीव्हीचा अवास्तव वापर टाळावा, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाऊ नये, जास्तीत जास्त ७ तासांपर्यंतच झोप घ्यावी. तासन्‌तास एकाच ठिकाणी न बसता शारीरिक हालचाली वाढवाव्यात.

मैदानी खेळ बंद होऊन मोबाईल, टिव्हीचा अति वापर, सतत जंक फूड खाणे, परीक्षा, शाळा नसल्याने कमी झालेला तणाव, मोबाईलवर खेळण्याच्या निमित्ताने वाढलेले बैठक आणि आहारातील अनियमितपणा ही वजन वाढण्याची कारणे आहेत. त्यामुळे मुलांनी फिजिकल ॲक्टीव्हिटीज्‌ वाढविल्या पाहिजेत. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करणे आवश्यक आहे.

- डॉ.श्याम जेथलिया, बाल रोग तज्ज्ञ

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्याने वजन वाढत आहे. त्याबरोबर जंकफूडचा अतिवापर होत आहे. विद्यार्थी दिवसभर घरीच असल्याने जंकफूड अधिक प्रमाणात खातात. झोपण्याची, आहाराच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे मुलांचे वजन वाढू शकते. तेव्हा मुलांनी नियमित योगासने केली पाहिजेत. सकस आहार घ्यावा.

डॉ. महेंद्र शर्मा, परभणी.