शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही ...

परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असून, आता मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने अजूनही सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थी घरीच बसून आहेत. सकाळी उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी घरी आल्यानंतर जेवण, सायंकाळच्या सुमारास मैदानावर जाऊन खेळणे, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा नित्यक्रम पार बिघडून गेला आहे. ऑनलाईनच्या निमित्ताने मोबाईल हातात आल्याने दिवसभर मोबाईल, टिव्ही आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत शारीरिक हालचालीच राहिल्या नाहीत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम वजन वाढण्यावर झाला आहे. ही समस्या आता जवळपास अनेक पालकांना सतावत आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या वेळेचे नियोजन करून देत त्यांच्या आहाराकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांनी हे करावे...

मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. नियमित सकाळी लवकर उठावे, रात्री लवकर झोपावे. शारीरिक हालचाली करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत मैदानी खेळ खेळावेत. जेवणाच्या वेळा ठरवून त्याच वेळी जेवण करावे. मोबाईल, टिव्ही पाहण्याच्या वेळा निश्चित कराव्यात.

मुलांनी हे करू नये...

मोबाईल, टीव्हीचा अवास्तव वापर टाळावा, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाऊ नये, जास्तीत जास्त ७ तासांपर्यंतच झोप घ्यावी. तासन्‌तास एकाच ठिकाणी न बसता शारीरिक हालचाली वाढवाव्यात.

मैदानी खेळ बंद होऊन मोबाईल, टिव्हीचा अति वापर, सतत जंक फूड खाणे, परीक्षा, शाळा नसल्याने कमी झालेला तणाव, मोबाईलवर खेळण्याच्या निमित्ताने वाढलेले बैठक आणि आहारातील अनियमितपणा ही वजन वाढण्याची कारणे आहेत. त्यामुळे मुलांनी फिजिकल ॲक्टीव्हिटीज्‌ वाढविल्या पाहिजेत. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करणे आवश्यक आहे.

- डॉ.श्याम जेथलिया, बाल रोग तज्ज्ञ

लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्याने वजन वाढत आहे. त्याबरोबर जंकफूडचा अतिवापर होत आहे. विद्यार्थी दिवसभर घरीच असल्याने जंकफूड अधिक प्रमाणात खातात. झोपण्याची, आहाराच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे मुलांचे वजन वाढू शकते. तेव्हा मुलांनी नियमित योगासने केली पाहिजेत. सकस आहार घ्यावा.

डॉ. महेंद्र शर्मा, परभणी.