शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

लॉकडाऊनने वाढला मुलांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, ...

परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पालकांनी मुलांमध्ये काही वेळ घालविला तर निश्चितच त्यांचा ताण कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता पालकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्या. मध्यंतरी डिसेंबर आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला ; परंतु तो अल्पकाळासाठी ठरला. आता पुन्हा शाळा बंद आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून मुले घरात कोंडली गेली आहेत. मुक्तपणे मैदानांवर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल आणि टीव्ही व्यतिरिक्त मनोरंजनाचे साधन शिल्लक नाही. घराच्या बाहेर आणि फार तर फार कंपाउंड वॉलच्या बाहेर मुलांना पडता येत नाही. त्यामुळे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. एकाच ठिकाणी बसून मुले बोअर होत असून आपले मित्र, सवंगडी भेटत नसल्याने ही समस्या आणखीच वाढली आहे. क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळांना मुरड घातली गेली आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचा चिडचिडेपणा, तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत घरात छोटे छोटे खेळ खेळावेत . मुलांचा चिडचिडेपणा झाला तरी त्यांना समजून घ्यावे, त्यांच्याशी एकरूप होऊन वागल्याचे निश्चितच मुलांचे आरोग्यही सुदृढ होऊ शकते.

मोबाईल, टीव्हीने वाढला एकलकोंडेपणा

मैदानी खेळ नसल्याने बहुतांश मुले आता मोबाईल आणि टीव्हीशी एकरूप झाले आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल सोबत असल्याने मुलांमध्ये एकलकोंडेपणाही वाढला आहे. ही मुले इतरांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.

तज्ज्ञांनी काय सल्ला दिला

शाळा बंद असल्याने मुलांच्या मनावर निश्चितच परिणाम झाला आहे. त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांसमवेत घालवावा. त्यांच्यासोबत खेळावे, एक चांगले वातावरण मुलांसमवेत तयार केल्यास मुलांचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होईल.

डॉ. श्याम जेथलिया, बालरोगतज्ज्ञ

मुलांवर नक्कीच ताण वाढला आहे. त्यांचा चिडचिडेपणा देखील वाढला आहे. त्यासाठी पालकांनी वेळेची विभाजन करून मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे. हे करीत असताना स्वतः देखील त्या प्रमाणेच वागावे. ठराविक वेळेतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी तसेच अभ्यास, खेळणे, जेवण यासाठीच्या वेळेचे योग्य नियोजन करून त्याचे स्वतः पालन केल्यास मुले देखील पालन करतील. तसेच मुलांसमवेत दररोज कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटीज पालकांनी करावी. तरच मुलांमध्ये दडलेल्या भावना ते पालकांसमोर व्यक्त करतील आणि त्यांचा ताण कमी होईल.

डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ