शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लॉकडाऊनने वाढला मुलांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, ...

परभणी : मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरात अडकून पडली आहेत. परिणामी मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून, पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पालकांनी मुलांमध्ये काही वेळ घालविला तर निश्चितच त्यांचा ताण कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता पालकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्या. मध्यंतरी डिसेंबर आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला ; परंतु तो अल्पकाळासाठी ठरला. आता पुन्हा शाळा बंद आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून मुले घरात कोंडली गेली आहेत. मुक्तपणे मैदानांवर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल आणि टीव्ही व्यतिरिक्त मनोरंजनाचे साधन शिल्लक नाही. घराच्या बाहेर आणि फार तर फार कंपाउंड वॉलच्या बाहेर मुलांना पडता येत नाही. त्यामुळे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. एकाच ठिकाणी बसून मुले बोअर होत असून आपले मित्र, सवंगडी भेटत नसल्याने ही समस्या आणखीच वाढली आहे. क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळांना मुरड घातली गेली आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचा चिडचिडेपणा, तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत घरात छोटे छोटे खेळ खेळावेत . मुलांचा चिडचिडेपणा झाला तरी त्यांना समजून घ्यावे, त्यांच्याशी एकरूप होऊन वागल्याचे निश्चितच मुलांचे आरोग्यही सुदृढ होऊ शकते.

मोबाईल, टीव्हीने वाढला एकलकोंडेपणा

मैदानी खेळ नसल्याने बहुतांश मुले आता मोबाईल आणि टीव्हीशी एकरूप झाले आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल सोबत असल्याने मुलांमध्ये एकलकोंडेपणाही वाढला आहे. ही मुले इतरांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.

तज्ज्ञांनी काय सल्ला दिला

शाळा बंद असल्याने मुलांच्या मनावर निश्चितच परिणाम झाला आहे. त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांसमवेत घालवावा. त्यांच्यासोबत खेळावे, एक चांगले वातावरण मुलांसमवेत तयार केल्यास मुलांचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होईल.

डॉ. श्याम जेथलिया, बालरोगतज्ज्ञ

मुलांवर नक्कीच ताण वाढला आहे. त्यांचा चिडचिडेपणा देखील वाढला आहे. त्यासाठी पालकांनी वेळेची विभाजन करून मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे. हे करीत असताना स्वतः देखील त्या प्रमाणेच वागावे. ठराविक वेळेतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी तसेच अभ्यास, खेळणे, जेवण यासाठीच्या वेळेचे योग्य नियोजन करून त्याचे स्वतः पालन केल्यास मुले देखील पालन करतील. तसेच मुलांसमवेत दररोज कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटीज पालकांनी करावी. तरच मुलांमध्ये दडलेल्या भावना ते पालकांसमोर व्यक्त करतील आणि त्यांचा ताण कमी होईल.

डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ