शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कवडा शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील कवडा शिवारात १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील कवडा शिवारात १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बिबट्याचा शोध घेणाऱ्या पथकाला अद्यापही यश आले नसल्याने कवडासह वाघी धानोरा, वडी या शिवारातील ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम आहे.

जिंतूर तालुक्यात ४ फेब्रुवारी रोजी एका कुत्रीचा आणि निल गायीची शिकार बिबट्याने केली होती. त्यामुळे या भागात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला पत्र देऊन बिबट्याचा शोध घेण्याची मागणी केली होती. वनविभागाने थातूरमातूर कारवाई करीत या भागातून काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी वाघी धानोरा या गावाकडे जाणाऱ्या ग्रामस्थांच्या वाहनासमोर बिबट्या आला होता. या बिबट्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी तयार केला. हा व्हिडिओ समाज माध्यमातून फिरल्यानंतर वनविभागाने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. मात्र वनविभागाच्या पदरी निराशाच पडली. याचदरम्यान दि. १७ फेब्रुवारी रोजी कवडा येथील शेतकरी विनोद चव्हाण यांना बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागालाही ही माहिती देण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील भोसी शिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलाला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले होते. त्यामुळे मादी बिबट्या या पिलाच्या शोधात फिरत असावी, अशी शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत. मात्र अद्याप बिबट्या हाती लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीती कायम आहे.

बोरगळवाडी-कावी शिवारात लावला पिंजरा

दरम्यान, या संदर्भात वनपाल गणेश घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, बोरगळवाडी- कावी गावाच्या शिवारात पिंजरा लावण्यात आला असून, वनपाल घुगे व त्यांचे सहकारी डी. जी. कोल्हेवाड, पांडुरंग वाघ, केशव राठोड आदी रात्रीच्या वेळी गस्त घालून शोध घेत आहेत.

तर जबाबदार कोण?

या भागात बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतरही वनविभागाने केवळ गस्त घालण्याची थातूरमातूर कारवाई करीत जनजागृती करून काढता पाय घेतला आहे. बिबट्या मात्र या भागात वावरतच आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.