शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

नेत्यांनो राजीनामे नको,आपली भूमिका मांडा; सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 31, 2023 17:36 IST

पुढाऱ्यांना गाव बंदी केल्यामुळे त्यांना आपले घर सोडता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी आमदारकीचे राजीनामे पुढे केल्याची भावना समाज माध्यमातून पुढे येत आहे.

परभणी : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार पातळीवर अपेक्षितरित्या सोडवला जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदीचे केलेल्या आवाहानाची अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाल्याने जवळपास सर्वच पुढारी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आपले पद ठेवून काय करणार म्हणून अनेकांनी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे राजीनामे देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु संबंधितांनी राजीनामे न देता आपली भूमिका पक्ष पातळीवर तसेच ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवून आपली भुमिका मांडावी, अशी अपेक्षा मंगळवारी सकल मराठा समाजाने घेतलेल्या पत्रपरिषदेतून मांडली.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकेल असे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनाची मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दखल घेऊन ४० दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला प्रारंभ केला. परिणामी सरकारसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. पुढाऱ्यांना गाव बंदी केल्यामुळे त्यांना आपले घर सोडता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी आमदारकीचे राजीनामे पुढे केल्याची भावना समाज माध्यमातून पुढे येत आहे. परंतु त्यांनी राजीनामे न देता मराठा समाजाच्या भावना सभागृहात मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा पत्रपरिषदेतून स्पष्ट करण्यात आली

नेत्यांनी भान ठेवून बोलावेमराठा समाज गेल्या काही वर्षापासून शांत, संयमी पद्धतीने मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अत्यंत संयमी पद्धतीने आंदोलन, उपोषण करत आहे. परंतु समाजाची दिशाभूल करून सरकार त्यांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे. त्यामुळे सरकारसह लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन समाजाला अस्वस्थ करण्याची सध्या वेळ आहे. परंतु काही ठिकाणी लोकप्रतिनिधी चुकीचे वक्तव्य करत असल्याने त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तशीच काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यातमन समोर येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह सरकारने सुद्धा मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देत संयमी पद्धतीने बोलून समाजाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी