शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्येही धावेना ग्रामीण भागात लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत; मात्र ...

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत; मात्र ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक फेऱ्या बंद असल्याने एस.टी.महामंडळाची लालपरी केवळ शहरवासीयांसाठीच धावते की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांना पडू लागला आहे.

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांकडे ४४५ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून कोरोना संसर्गाच्या अगोदर दरदिवस १८३५ फेऱ्या करण्यात येत होत्या. यातून एकट्या परभणी बसस्थानकावर १० हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत होती.

मात्र आता अनलॉक झाले असतानाही सात आगारातून केवळ ११२६ बसफेऱ्या करण्यात येत आहेत. त्यातही शहरी भागातच जास्त बसेस धावत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाची लालपरी कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात

आहे.

७०९ बसफेऱ्या

अद्यापही बंदच

कोरोनाच्या संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या १८३५ फेऱ्या नियमित होत असत; मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महिनाभरापासून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. केवळ ११२६ बसफेऱ्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला ७०९ बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.

उत्पन्न वाढेना

कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जवळपास १८३५ फेऱ्या दिवसभरात होत होत्या. यातून दिवसभरात ५० लाखाहून अधिक उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या सात आगारांना मिळत होते; मात्र सध्या केवळ ११२६ बसफेऱ्या सुरू आहेत. त्यातही बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

दिवसाकाठी कसेबसे १९ लाख रुपयांचे उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या हातात पडत आहे. त्यामुळे महिनाभरापासून एस.टी.महामंडळाची सेवा सुरू होऊनही उत्पन्न वाढत नसल्याने प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविल्यास उत्पन्नात भर पडेल.

सेलू, जिंतूर, पाथरी शहरांकडेच ओढा

जिल्हा प्रशासनाने एस.टी. महामंडळाला परवानगी दिल्यानंतर विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

मात्र आगार प्रशासनाने ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसेस सुरू करणे गरजेचे होते;

मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पाथरी, सेलू, जिंतूर या शहरांकडे सर्वाधिक बसफेऱ्या सुरू झाल्या.