शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

अनलॉकमध्येही धावेना ग्रामीण भागात लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ...

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक फेऱ्या बंद असल्याने एस.टी.महामंडळाची लालपरी केवळ शहरवासीयांसाठीच धावते की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांना पडू लागला आहे.

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांकडे ४४५ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून कोरोना संसर्गाच्या अगोदर दरदिवस १८३५ फेऱ्या करण्यात येत होत्या. यातून एकट्या परभणी बसस्थानकावर १० हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत होती.

मात्र, आता अनलॉक झाले असतानाही सात आगारांतून केवळ ११२६ बसफेऱ्या करण्यात येत आहेत. त्यातही शहरी भागातच जास्त बसेस धावत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाची लालपरी कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

७०९ बसफेऱ्या

अद्यापही बंदच

कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या १८३५ फेऱ्या नियमित होत असत; मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महिनाभरापासून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. केवळ ११२६ बसफेऱ्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला ७०९ बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.

उत्पन्न वाढेना

कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जवळपास १८३५ फेऱ्या दिवसभरात होत होत्या. यातून दिवसभरात ५० लाखांहून अधिक उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या सात आगारांना मिळत होते. मात्र, सध्या केवळ ११२६ बसफेऱ्या सुरू आहेत. त्यातही बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

दिवसाकाठी कसेबसे १९ लाख रुपयांचे उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या हातात पडत आहे. त्यामुळे महिनाभरापासून एस.टी.महामंडळाची सेवा सुरू होऊनही उत्पन्न वाढत नसल्याने प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविल्यास उत्पन्नात भर पडेल.

सेलू, जिंतूर, पाथरी शहरांकडेच ओढा

जिल्हा प्रशासनाने एस.टी. महामंडळाला परवानगी दिल्यानंतर विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून आगारप्रमुखांना बस सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

मात्र, आगार प्रशासनाने ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसेस सुरू करणे गरजेचे होते.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पाथरी, सेलू, जिंतूर या शहरांकडे सर्वाधिक बसफेऱ्या सुरू झाल्या.