शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणी जिल्ह्यात ५० टक्के सिंचनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जाते़ दरवर्षी हे पाणी मिळणे अपेक्षित आहे़ मात्र मागील काही वर्षांपासून जायकवाडी प्रकल्पातच पाणी नसल्याने या प्रकल्पावरील सिंचन रखडले होते़ या वर्षी मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने भरला असून, जायकवाडीचे पाणी परभणी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे़ उपलब्ध पाण्यामधून जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़ परभणी जिल्ह्यातून जाणाºया जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून ९७ हजार ४०० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येते़ त्या तुलनेत ४५ हजार हेक्टर सिंचन झाले आहे़ यावर्षी जिल्ह्याला ४ पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत़ साधारणत: ३५ दिवसांची एक पाणी पाळी असते़ या काळात कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे ३० ते ३५ हजार एवढे सिंचन दरवर्षी होते़ यावर्षी सिंचनात वाढ झाल्याचेही अधिकाºयांनी सांगितले़ मात्र प्रत्यक्षात ९७ हजार ४०० हेक्टर जमीन सिंचन होणे अपेक्षित आहे़ परंतु, नादुरुस्त कालवे आणि पाण्याची वहन क्षमता कमी असल्याने सिंचनात अडथळे निर्माण होत आहेत़ (समाप्त)पाणी क्षमतेचाही परिणामजायकवाडी डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ३६०० क्युसेस एवढी आहे़ मात्र या पूर्ण क्षमतेने कालव्यात कधीही पाणी सोडले जात नाही़ दोन वर्षांपूर्वी ८०० ते ९०० क्युसेसने पाणी मिळाले होते़ यावर्षी देखील पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला़ त्यानंतर १२०० ते १३०० क्युसेसने पाणी उपलब्ध झाले आहे़ त्यामुळे पाणी वहन क्षमताही जास्तीत जास्त सिंचनासाठी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले़