शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ५० टक्के सिंचनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़परभणी जिल्ह्यातील रबी हंगामासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जाते़ दरवर्षी हे पाणी मिळणे अपेक्षित आहे़ मात्र मागील काही वर्षांपासून जायकवाडी प्रकल्पातच पाणी नसल्याने या प्रकल्पावरील सिंचन रखडले होते़ या वर्षी मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने भरला असून, जायकवाडीचे पाणी परभणी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे़ उपलब्ध पाण्यामधून जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़ परभणी जिल्ह्यातून जाणाºया जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून ९७ हजार ४०० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येते़ त्या तुलनेत ४५ हजार हेक्टर सिंचन झाले आहे़ यावर्षी जिल्ह्याला ४ पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत़ साधारणत: ३५ दिवसांची एक पाणी पाळी असते़ या काळात कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे ३० ते ३५ हजार एवढे सिंचन दरवर्षी होते़ यावर्षी सिंचनात वाढ झाल्याचेही अधिकाºयांनी सांगितले़ मात्र प्रत्यक्षात ९७ हजार ४०० हेक्टर जमीन सिंचन होणे अपेक्षित आहे़ परंतु, नादुरुस्त कालवे आणि पाण्याची वहन क्षमता कमी असल्याने सिंचनात अडथळे निर्माण होत आहेत़ (समाप्त)पाणी क्षमतेचाही परिणामजायकवाडी डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ३६०० क्युसेस एवढी आहे़ मात्र या पूर्ण क्षमतेने कालव्यात कधीही पाणी सोडले जात नाही़ दोन वर्षांपूर्वी ८०० ते ९०० क्युसेसने पाणी मिळाले होते़ यावर्षी देखील पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला़ त्यानंतर १२०० ते १३०० क्युसेसने पाणी उपलब्ध झाले आहे़ त्यामुळे पाणी वहन क्षमताही जास्तीत जास्त सिंचनासाठी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले़