शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला ...

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोलसह डिझेलचे दरही आता शंभरीकडे पोहोचू लागले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. डिझेलच्या किमतीही वाढत असल्याने मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. परिणामी बाहेरगावाहून आवक होणाऱ्या भाजीपाल्यासह किराणा मालाच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. इंधनाच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून गेले आहे. नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.

परभणी पेट्रोल १०७ रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे; तर डिझेलही ९७.९५ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होत आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच जिल्ह्यातील नागरिक आर्थिक संकटात असताना त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने आर्थिक अडचणीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या वाढलेल्या महागाईचा सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध केला जात आहे.

डाळी, खाद्यतेल महागले

मागील वर्षीच्या तुलनेत डाळ आणि खाद्यतेलाचे दर १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. मध्यंतरी खाद्यतेल १६५ रुपये लिटरपर्यंत पोहोचले होते. ही दरवाढ कमी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत १५ रुपयांनी खाद्यतेल महागले आहे. सोयाबीन तेल मागील वर्षी १०० रुपये लिटर या दराने विक्री झाले. या वर्षी सोयाबीन तेलाचा दर १३५ रुपये लिटर असा आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ८० रुपये किलो या दराने विक्री होणारी तूरडाळ सध्या ९५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. चणाडाळीचे दर मात्र स्थिर आहेत.

गवार ८० रुपये किलो

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. गवारीच्या शेंगा ८० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. त्याचप्रमाणे पानकोबी, फूलकोबी, वांगी ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. बटाट्याचे दर हे ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सिमला मिरची, कारले, दोडके, मेथी, पालक या भाज्यांचे दरही कडाडले आहेत.

इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा फटका किराणा बाजारभावावरही झाला आहे. विशेष म्हणजे त्यात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेलाबरोबरच तूरडाळीच्या किमतीही वाढलेल्या आहेत. मात्र साखर, चणाडाळीच्या किमती स्थिर आहेत. एकंदर या दरवाढीचा फटका व्यापाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

विष्णू वट्टमवार, व्यापारी

बिटावर भाजी महाग मिळत असल्याने आम्हाला त्याच दराने भाजी विक्री करावी लागते. मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. ४० ते ५० रुपये किलो विक्री होणाऱ्या भाज्या ६० ते ८० रुपये किलो या दराने विकाव्या लागत आहेत. त्यामुळे व्यवसायात अधिक रक्कम गुंतवावी लागत असून, त्याचा फटका बसत आहे.

रमेश रणेर, भाजी विक्रेता

मागच्या काही महिन्यांपासून किराणा मालावरील खर्च वाढला आहे. महिन्याकाठी किराणा साहित्यासाठी राखून ठेवलेल्या रकमेत महिन्याभराचा किराणा येत नाही. त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. त्यातच तेल, डाळींच्या किमती वाढल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

योगिता हलगरकर, गृहिणी

भाजीपाल्याबरोबरच किराणा बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे आम्ही त्रस्त आहोत. महिन्याकाठी ठरावीक रकमेचे नियोजन केले जाते. मात्र त्यात महिन्याचा किराणा आणि भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहा महिन्यांपासून या किमती वाढतच चालल्याने महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.