शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सहा महिन्यातच साडेचार किमी रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ...

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ''जैसे थे'' झाल्याने रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा परभणी शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरातील दहा ते पंधरा गावांची दररोज रस्त्याने वाहतूक होते; मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर रस्ता मंजूर झाला अन्‌ रडत पडत कामही पूर्ण करण्यात आले; परंतु अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर २५ ते ३० ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरणादरम्यानच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या; परंतु अभियंत्याने इस्टिमेट प्रमाणेच काम होत असल्याची समजूत काढत हा रस्ता पूर्ण केला. सध्या मात्र रस्त्याची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अभियंत्याच्या दुर्लक्षाचा परिणाम

अवघ्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्याचे कामाकडे दुर्लक्ष झाले. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांची अभियंत्याने समजूत काढली; परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर पडलेले खड्डे निकृष्ट कामाची साक्ष देत आहेत. या प्रकरणात अभियंता आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुदतीनंतर झाले काम

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१७-१८मध्ये टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यासाठी ३.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्ता पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत दिली होती. याचा अर्थ ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात मार्च २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. निकृष्ट डांबर वापरत आवश्यक त्या ठिकाणी भर घातली नसल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीच रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या.

पुलालादेखील तडे

या रस्त्यावर कार्ला ते कुंभारी दरम्यान पूल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता या पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.