शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सहा महिन्यातच साडेचार किमी रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ...

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ''जैसे थे'' झाल्याने रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा परभणी शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरातील दहा ते पंधरा गावांची दररोज रस्त्याने वाहतूक होते; मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर रस्ता मंजूर झाला अन्‌ रडत पडत कामही पूर्ण करण्यात आले; परंतु अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर २५ ते ३० ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरणादरम्यानच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या; परंतु अभियंत्याने इस्टिमेट प्रमाणेच काम होत असल्याची समजूत काढत हा रस्ता पूर्ण केला. सध्या मात्र रस्त्याची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अभियंत्याच्या दुर्लक्षाचा परिणाम

अवघ्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्याचे कामाकडे दुर्लक्ष झाले. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांची अभियंत्याने समजूत काढली; परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर पडलेले खड्डे निकृष्ट कामाची साक्ष देत आहेत. या प्रकरणात अभियंता आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुदतीनंतर झाले काम

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१७-१८मध्ये टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यासाठी ३.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्ता पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत दिली होती. याचा अर्थ ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात मार्च २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. निकृष्ट डांबर वापरत आवश्यक त्या ठिकाणी भर घातली नसल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीच रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या.

पुलालादेखील तडे

या रस्त्यावर कार्ला ते कुंभारी दरम्यान पूल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता या पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.