शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यातच साडेचार किमी रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ...

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर पंचवीस ठिकाणी खड्डे झाले असून, हा रस्ता आता ''जैसे थे'' झाल्याने रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा परभणी शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरातील दहा ते पंधरा गावांची दररोज रस्त्याने वाहतूक होते; मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर रस्ता मंजूर झाला अन्‌ रडत पडत कामही पूर्ण करण्यात आले; परंतु अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्यावर २५ ते ३० ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरणादरम्यानच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या; परंतु अभियंत्याने इस्टिमेट प्रमाणेच काम होत असल्याची समजूत काढत हा रस्ता पूर्ण केला. सध्या मात्र रस्त्याची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अभियंत्याच्या दुर्लक्षाचा परिणाम

अवघ्या साडेचार किमी अंतराच्या रस्त्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्याचे कामाकडे दुर्लक्ष झाले. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांची अभियंत्याने समजूत काढली; परंतु रस्ता पूर्ण झाल्यानंतर पडलेले खड्डे निकृष्ट कामाची साक्ष देत आहेत. या प्रकरणात अभियंता आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुदतीनंतर झाले काम

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१७-१८मध्ये टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यासाठी ३.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्ता पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत दिली होती. याचा अर्थ ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात मार्च २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. निकृष्ट डांबर वापरत आवश्यक त्या ठिकाणी भर घातली नसल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीच रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या.

पुलालादेखील तडे

या रस्त्यावर कार्ला ते कुंभारी दरम्यान पूल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता या पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.