शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; धन कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही या निवडणुकीचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही या निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गावोगावी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडणे, मतदानानंतर मतमोजणी निकाल जाहीर करण्याची कामे या कर्मचाऱ्यांनी केली. कोणत्याही निवडणुकीत निवडणूक संपताच अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन अदा केले जाते. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडून आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही या कर्मचाऱ्यांचे मानधन दिलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन वितरीत करण्यासाठी प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. निधीअभावी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वात संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी काम करुन निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या. मात्र, त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे.

५६६

जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती

१५७३

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी

४८१९

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी

निधीची अडचण

कोणत्याही निवडणुका पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतर काही दिवसातच त्यांचे मानधन मिळते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. सध्या निधी नसल्याने मानधन थकल्याचे सांगितले जाते.

तालुकानिहाय आढावा

तालुका ग्रामपंचायती अधिकारी/कर्मचारी

परभणी ७९ १०२८

जिंतूर ९० ११३२

सेलू ५५ ६९६

पाथरी ३८ ४४८

मानवत ३९ ४८४

सोनपेठ ३४ ४३६

गंगाखेड ६० ७६०

पालम ४५ ५६४

पूर्णा ५८ ७४४