शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:19 IST

जिंतूर-येलदरी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष संबधित ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली.

ठळक मुद्दे५९० दिवसांनंतरही रस्त्याचे काम अर्धवट४ कोटी ६२ लाखांचा निधी उपलब्ध

- विजय चोरडियाजिंतूर : जिंतूर- येलदरी रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १२ महिन्यांमध्ये पूर्ण करावयाचे काम १९ महिने १५ दिवस लोटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच ३७ दिवसांपूर्वी ९ किमी अंतरावर केलेल्या कार्पेटच्या रस्त्यावर तब्बल १९६ खड्डे पडल्याचा प्रकार प्रत्यक्ष गुरुवारी केलेल्या पाहणीत समोर आला आहे. 

जिंतूर-येलदरी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष संबधित ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली. १६ किमी रस्त्याच्या या कामाचे १५ डिसेंबर २०१८ रोजी नाशिक  येथील शामा कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर मिळाले होते; परंतु, संबंधित कंपनीने हे काम न करता स्थानिक कंत्राटदाराकडे हे काम वर्ग केले़ करारानुसार १२ महिन्यांमध्ये १६ किमीचे काम संबंधित कंपनीला पूर्ण करावयाचे होते़ त्यासाठी ४ कोटी ६२ लाख ४० हजार ३१५ रुपयांचा निधीही उपलब्ध झाला; परंतु, ५९० दिवसानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही़ ३७ दिवसांपूर्वी म्हणजे जून महिन्यामध्ये या रस्त्याच्या कार्पेटचे काम संबंधित कंत्राटदाराने सुरू केले़ जोरदार पाऊस सुरू असताना कंत्राटदाराकडून कार्पेटचे काम सुरू होते.  ८ ते १० दिवस हे काम चालले.

पाऊस पडत असताना या कामाच्या संदर्भात कोणतीही काळजी न घेता हे काम सुरूच ठेवले़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार ७ जूननंतर डांबरीकरणाचे काम केले जात नाही; परंतु, संबंधित गुत्तेदाराने या नियमाला डावलून पावसाळ्यात रस्त्याच्या कार्पेटचे काम केले़ ५९० दिवसानंतरही ९ किमीचे काम झाले, नसून, जवळपास ६ किमी कार्पेटचे काम बाकी आहे़ कार्पेटचे काम करीत असताना आॅईल मिश्रित डांबराचा वापर करण्यात आला. तसेच डांबर कमी वापरल्यामुळे ९ किमीच्या रस्त्यामध्ये ३७ दिवसांच्या कार्यकाळात १९६ खड्डे आढळून आले़ हे खड्डे म्हणजे सार्वज्निक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाचा कळस दिसून येत आहे़ या सर्व गोष्टीला संबंधित गुत्तेदार व सा़बां़ विभागाचे अभियंते जबाबदार असून, या रस्त्याचे काम नव्याने परत करून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ 

राजकीय गुत्तेदारीमुळे निकृष्ट कामजिंतूर- येलदरी रस्त्याच्या कामाचे शामा कन्स्ट्रक्शन कंपनी नाशिक यांच्या नावाने टेंडर असले तरी प्रत्यक्षात काम करणारे कंत्राटदार हे स्थानिक पातळीवरील आहेत़ राजकीय दबावाखाली काम होत असल्याने अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नाहीत़ या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिंतूरकरांतून होत आहे़ 

सा़बां़ विभाग गुत्तेदाराला शरणपावसाळ्यात रस्त्याच्या कामासाठी सा़बां़ विभागाने संबंधित कंत्राटदाराला मूक संमती दिली आहे़ सा़बां़ विभागाचे कारकून व त्या ठिकाणचे अभियंते रस्त्याच्या कामावर जाऊन आल्याने या कंत्राटदाराला सा़बां़ने पावसाळ्यात काम करण्यास शासनाकडून विशेष परवानगी दिली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़ सा़बां़ विभागाने संबंधित कंत्राटदाराकडे शरणागती पत्करली की काय, अशीच भावना जिंतूरकरांच्या मनात आहे़ 

जिंतूर-येलदरी रस्त्यावर ४ कोटी ६२ लाखांचा खर्च होत असताना कामाचा दर्जा राखण्यात आला नाही़ त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून निकृष्ट कामाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी़-अ‍ॅड़ मनोज सारडा, जनआंदोलन समिती, जिंतूर 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाparabhaniपरभणीfundsनिधी