शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

जीवन अमृत सेवा; ‘ब्लड ऑन कॉल’ने ९९३ रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:47 IST

४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची अंमलबजावणी

ठळक मुद्दे१०४ टोल फ्रीला चांगला प्रतिसाद

परभणी : राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून या योजनेतून १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या १० महिन्यात ९९३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड ऑन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ९९३ रुग्णांचे १० महिन्यात प्राण वाचविले आहेत.

एखाद्या घटनेतील रुग्णाला तात्काळ रक्त मिळावे, रक्तावाचून रुग्णाचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजनेंतर्गत रुग्णांना रक्तपिशवीची आवश्यकता असल्यास त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णाला अर्ध्यातासात रक्ताचा पुरवठा केला जातो. २०१४ पासून सुरु केलेल्या या योजनेला दरवर्षी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात ७४६ रुग्णांना ‘ब्लड ऑन कॉल’ या योजनेतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्याच बरोबर २०१५ या आर्थिक वर्षात ७२३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला. तसेच २०१६ मध्ये १ हजार २० रुप्णांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रक्त पिशवी मिळविली आहे. २०१७ मध्ये ७३२ तर २०१८ मध्ये ७१९, २०१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक १ हजार २५८ तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यात ९९३ रुग्णांना जीवन अमृत योजनेंतर्गत रक्त पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास एक प्रकारची मदत झाली आहे.

असा झाला रक्तपुरवठापरभणी जिल्ह्यामध्ये अरुणोदय बहुउद्देशीय सेवा संस्था चाटोरी मार्फत जीवन अमृत सेवा म्हणजेच ब्लड ऑन कॉलचे काम पाहिले जाते. या संस्थेने १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ९९३ रुग्णांना ४० कि.मी. अंतरापर्यंत रक्त पिशव्या पोहचविल्या आहेत. यामध्ये जानेवारीत ११६, फेब्रुवारी ११८, मार्च १२८, एप्रिल ९२. मे ९८, जून ९५, जुलै ९७, ऑगस्ट ८१, सप्टेंबर ८५ तर ऑक्टोबर महिन्यात ८३ रुग्णांना रक्त पुरवठा करुन त्याचे प्राण वाचविण्यास मदत केली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीBlood Bankरक्तपेढी