शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जीवन अमृत सेवा; ‘ब्लड ऑन कॉल’ने ९९३ रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:47 IST

४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची अंमलबजावणी

ठळक मुद्दे१०४ टोल फ्रीला चांगला प्रतिसाद

परभणी : राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून या योजनेतून १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या १० महिन्यात ९९३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड ऑन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ९९३ रुग्णांचे १० महिन्यात प्राण वाचविले आहेत.

एखाद्या घटनेतील रुग्णाला तात्काळ रक्त मिळावे, रक्तावाचून रुग्णाचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजनेंतर्गत रुग्णांना रक्तपिशवीची आवश्यकता असल्यास त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णाला अर्ध्यातासात रक्ताचा पुरवठा केला जातो. २०१४ पासून सुरु केलेल्या या योजनेला दरवर्षी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात ७४६ रुग्णांना ‘ब्लड ऑन कॉल’ या योजनेतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्याच बरोबर २०१५ या आर्थिक वर्षात ७२३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला. तसेच २०१६ मध्ये १ हजार २० रुप्णांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रक्त पिशवी मिळविली आहे. २०१७ मध्ये ७३२ तर २०१८ मध्ये ७१९, २०१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक १ हजार २५८ तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यात ९९३ रुग्णांना जीवन अमृत योजनेंतर्गत रक्त पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास एक प्रकारची मदत झाली आहे.

असा झाला रक्तपुरवठापरभणी जिल्ह्यामध्ये अरुणोदय बहुउद्देशीय सेवा संस्था चाटोरी मार्फत जीवन अमृत सेवा म्हणजेच ब्लड ऑन कॉलचे काम पाहिले जाते. या संस्थेने १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ९९३ रुग्णांना ४० कि.मी. अंतरापर्यंत रक्त पिशव्या पोहचविल्या आहेत. यामध्ये जानेवारीत ११६, फेब्रुवारी ११८, मार्च १२८, एप्रिल ९२. मे ९८, जून ९५, जुलै ९७, ऑगस्ट ८१, सप्टेंबर ८५ तर ऑक्टोबर महिन्यात ८३ रुग्णांना रक्त पुरवठा करुन त्याचे प्राण वाचविण्यास मदत केली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीBlood Bankरक्तपेढी