शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

शहरातील रस्त्यांवर अस्थायी अतिक्रमणे परभणी : शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण ...

शहरातील रस्त्यांवर अस्थायी अतिक्रमणे

परभणी : शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. मनपाने बाजारपेठ भागासह मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यास रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होण्यास मदत होणार आहे. सध्या वसमत रोड ते उघडा महादेव या भागातील अतिक्रमणे हटविली जात आहेत. अशीच मोहीम बाजारपेठ भागातही राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

दोन महिन्यांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद

परभणी : येथील विद्यापीठ गेट भागातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरील रस्ता मागील दोन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या भागात उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना वळसा घालून विद्यापीठात जावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेता पुलाचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांत समाधान

परभणी : जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना पाणी देणे अत्यावश्यक झाले होते. याच दरम्यान दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे.

बाजारासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी

परभणी : येथील शनिवार बाजार भागात आठवडी बाजार भरविला जातो. त्यामुळे बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक ठप्प होत आहे. अरुंद रस्ते आणि त्यात बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. प्रत्येक शनिवारी निर्माण होणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

अवैध वाळू उपशाला लागेना लगाम

परभणी : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलीस व महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी हा उपसा अद्यापही थांबलेला नाही. गंगाखेड, पूर्णा आणि परभणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने अजूनही सर्व वाळू घाटांचे लिलाव केले नाहीत, त्यामुळे वाळूची चोरी वाढत चालली आहे. वाळू चोरीविरुद्ध कडक कारवाईची मागणी होत आहे.