शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, तूर पडली पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST

जिंतूर शहर व तालुक्यात मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला. सध्या ३-४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, खरीप ...

जिंतूर शहर व तालुक्यात मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला. सध्या ३-४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, खरीप हंगामातील काही पिकांचे झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तालुक्यात कापूस, तूर, सोयाबीन ही पिके पिवळी पडली आहेत. सततच्या पडलेल्या पावसामुळे शेतीतील खुरपणी, वखरणी, फवारणी, आंतरमशागतीची कामेसुद्धा खोळंबली होती. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीतील कामांना वेग आला आहे.

तूर पडली पिवळी

सततच्या पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन तसेच तूर हे पीक पिवळे पडले आहे. यातच सोयाबीन पिकांवर पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीला सुरुवात केली आहे. तूर पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी अनेक गावच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.