शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोरोनाकाळात जिल्ह्यात मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गकाळात जिल्ह्यातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे समोर येत ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गकाळात जिल्ह्यातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारपणे अपघाती आणि गंभीर आजाराने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात कोरोनाच्या आजारामुळे नागरिकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण झाली. विशेषत: पूर्वीपेक्षाही अधिक काळजी मुलांच्या बाबतीत घेण्यात आली. त्याचा परिणाम मृत्यूचे प्रमाण घटण्यात झाला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही घटले. याशिवाय शहरातील अंतर्गत वाहतूकही कमी असल्याने घरासमोर खेळणारी किंवा मुख्य रस्त्यालगत भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे बालकांचे होणारे मृत्यू जवळपास शून्यावर आले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३०७ नागिरकांचा मृत्यू झाला. त्यात १४ वर्षांच्या आतील केवळ एका बालकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. एकंदर कोरोनाकाळात जिल्ह्यातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे.

मुलींच्या मृत्यूची कारणे

मुलांमध्ये प्रतिकारक्षमता अधिक असते. त्यामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमीच असते. त्यातही एखादा आजार जडला, त्यावर वेळेत उपचार झाले नाही तरच मृत्यूची शक्यता असते.

मास्क वापराने आरोग्य अबाधित

लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. मुले शक्यतो घराबाहेर पडली नाहीत. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर झाला. त्यामुळे कोरोना वगळता इतर संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही कमी राहिले आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतर आजारांपासूनही मुलांचे संरक्षण या काळात झाले.