शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गाव विकासासाठी लोकसहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ...

परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

जिल्हा परिषद आणि साद माणुसकीची फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर रोजी साद ग्रामच्या वाटेवर असलेल्या ९ ग्रामपंचायतींतील सरपंच आणि ग्रामसेवकांसमवेत संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी टाकसाळे बोलत होते. कार्यक्रमास साद माणुसकीची फाऊंडेशनचे संचालक हरिष बुटले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, सहायक निबंधक नानासाहेब कदम, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, आप्पा वडीकर यांची उपस्थिती होती. यावेळी सहायक निबंधक नानासाहेब कदम यांनी ग्रामीण भागात विकासात्मक कामे करताना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वडी (ता. पाथरी), देऊळगाव गात (ता. सेलू), निळा (ता. सोनपेठ), मांडाखळी (ता. परभणी), नावकी (ता. पूर्णा), निवळी (ता. जिंतूर), पुयनी (ता. पालम), रामपुरी बु. (ता. मानवत), नरळद (ता. गंगाखेड) या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

उघड्यावरची हागणदारी बंद करणे, सांडपाणी जमिनीत जिरवणे, शाळा, अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, वृक्ष लागवड करणे, दारू बंदी अशी विविध कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन टाकसाळे यांनी केले. सहायक सहकार अधिकारी बी. सी. लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले. स्वच्छ भारत मिशनचे संवादतज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण लोहट, शिवाजीराव कुटे, माधव चांदणे, नागेश शिराळ, कृष्णा कानडे, विशाल यादव, माणिक सोळंके, प्रा. सुरेश खिस्ते, प्रताप शिंदे, संजय चिंचाणे आदींनी प्रयत्न केले.