शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

गाव विकासासाठी लोकसहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ...

परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

जिल्हा परिषद आणि साद माणुसकीची फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर रोजी साद ग्रामच्या वाटेवर असलेल्या ९ ग्रामपंचायतींतील सरपंच आणि ग्रामसेवकांसमवेत संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी टाकसाळे बोलत होते. कार्यक्रमास साद माणुसकीची फाऊंडेशनचे संचालक हरिष बुटले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, सहायक निबंधक नानासाहेब कदम, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, आप्पा वडीकर यांची उपस्थिती होती. यावेळी सहायक निबंधक नानासाहेब कदम यांनी ग्रामीण भागात विकासात्मक कामे करताना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वडी (ता. पाथरी), देऊळगाव गात (ता. सेलू), निळा (ता. सोनपेठ), मांडाखळी (ता. परभणी), नावकी (ता. पूर्णा), निवळी (ता. जिंतूर), पुयनी (ता. पालम), रामपुरी बु. (ता. मानवत), नरळद (ता. गंगाखेड) या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

उघड्यावरची हागणदारी बंद करणे, सांडपाणी जमिनीत जिरवणे, शाळा, अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, वृक्ष लागवड करणे, दारू बंदी अशी विविध कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन टाकसाळे यांनी केले. सहायक सहकार अधिकारी बी. सी. लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले. स्वच्छ भारत मिशनचे संवादतज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण लोहट, शिवाजीराव कुटे, माधव चांदणे, नागेश शिराळ, कृष्णा कानडे, विशाल यादव, माणिक सोळंके, प्रा. सुरेश खिस्ते, प्रताप शिंदे, संजय चिंचाणे आदींनी प्रयत्न केले.