शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

पुलाची उंची वाढवा; फाल्गुनी नदीच्या पुरात बसून ग्रामस्थांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 15:08 IST

सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

सोनपेठ ( परभणी ) : शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील फाल्गुनी नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात ग्रामस्थांनी आज आंदोलन केले .सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीवर कमी उंचीचा पुल आहे. यामुळे मुसळधार पावसात पुलावरून नेहमीच पाणी वाहते. पुलावरुन पाणी गेल्यास गोदाकाठच्या ११ गावांचा संपर्क तुटतो. या रस्त्यासाठी नागरिकांना अनेकदा आंदोलने केली. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

सातत्याने पुलावर पाणी येत असल्याने ग्रामस्थांची जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी ( दि.17 ) रात्री साठे आठच्या सुमारास एका ट्रँक्टरमध्ये जाणारी पाच मजूर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ट्रॉली उलटल्याने ट्रँक्टरहेडसह नदीत उलटले. पाच जण जाऊन झुडपांना अडकले. शेळगाव येथील ग्रामस्थांनी पाचही जणांंना दोरखंडांच्या सहाय्याने बाहेर काढले.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदु यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, अनिल रोडे, सोमनाथ नागुरे यांच्यासह गोदाकाठच्या ग्रामस्थांनी पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात बसून आंदोलन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे, नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी