शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार; कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार तीन विशेष रेल्वे

By राजन मगरुळकर | Updated: November 17, 2023 16:09 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात.

परभणी : कार्तिकी एकादशीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वे विभागाने ३ विशेष रेल्वे गाड्यांच्या सहा फेऱ्या पंढरपूरला सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या कालावधीत मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातून बिदर -पंढरपूर (०७५१७) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री १०.१५ वाजता निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता पोहोचेल. तसेच पंढरपूर -बिदर (०७५१८) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ४:३० वाजता बिदर येथे पोहोचणार आहे. आदिलाबाद पंढरपूर (०७५०१) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आदिलाबाद येथून निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता पोहोचेल. पंढरपूर- आदीलाबाद (०७५०२) ही रेल्वे २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता आदीलाबाद येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे पंढरपूर -नांदेड (०७५३१) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता पंढरपूर येथून निघून रात्री ८:४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. तर नांदेड -पंढरपूर (०७५३२) ही रेल्वे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२० वाजता नांदेड येथून निघणार असून दुसरे दिवशी सकाळी ७:३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व रेल्वे गाड्यांचे कोचेस विना आरक्षित राहणार आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPandharpurपंढरपूर