शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

उद्घाटन झालेला ' बिदर - गुलबर्गा '  मार्ग नवीन रेल्वेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:09 IST

बिदर-गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले़ मात्र या मार्गावरून एकही नवीन गाडी सुरू केली नसल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची घोर निराशा केल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे़ 

ठळक मुद्देबिदर ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन २९ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले़नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा न केल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची निराशा केली आहे 

परभणी : बिदर-गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले़ मात्र या मार्गावरून एकही नवीन गाडी सुरू केली नसल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची घोर निराशा केल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे़ 

बिदर ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन २९ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले़ या मार्गामुळे उत्तर ते दक्षिण भारताला सर्वात जवळून जोडणारा रेल्वे मार्ग उपलब्ध झाला आहे़ या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गावरून पूर्वीपासूनच धावणा-या बिदर - हुमनाबाद या रेल्वेचा गुलबर्गापर्यंत विस्तार करण्यात आला. मात्र एकही नवीन गाडी घोषित केली नाही़ त्यामुळे मराठवाडा तसेच कर्नाटकातील प्रवाशांची घोर निराशा झाली आहे़ मार्ग सुरू होवूनही नवीन गाडी घोषित होत नसेल तर या नवीन मार्गाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ 

मराठवाड्यातील परळी ते बिदर, परभणी मार्गे अकोला, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद ते बिदर, उस्मानाबाद - औरंगाबाद/नांदेड/अकोला आदी मार्गाची निर्मिती होवून अनेक वर्षे झाले. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे गाड्या उपलब्ध होत नाहीत़ त्यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राकेश भट, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, गौतम नाहटा, रविंद्र मुथा, नवीनकुमार चोैकडा, दीपक कुलथे, राजेश चव्हाण, ओंकारसिंह ठाकूर, प्रकाश मंडोत, संभानाथ काळे, डॉ़ राजगोपाल कालानी, दयानंद दीक्षित, प्रवीण थानवी आदींनी केली आहे़ 

नवीन रेल्वे गाड्यांची मागणीबिदर - गुलबर्गा या मार्गावर कन्याकुमारी-कटरा, औरंगाबाद-हुबळी, वाराणसी-म्हैसूर, नांदेड - गोवा या चार नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे़ तसेच नांदेड-बेंगलूर रेल्वेला बिदर व पुढे विकाराबाद ऐवजी गुलबर्गा मार्गे वळवावे, अशीही प्रवासी संघटनेची मागणी आहे.