शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

परभणी जिल्ह्यात जन्मदरातील तफावत वाढली; सहा वर्षांत सरासरी हजार मुलांमागे केवळ ८७८ मुली

By मारोती जुंबडे | Updated: December 5, 2023 18:10 IST

२०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे.

परभणी :  जिल्ह्यामध्ये मुले आणि मुली यांच्या जन्मदरामध्ये मोठा फरक आहे. २०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देता का मुलगी अशी स्थिती दिसून येणार आहे. या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. 

जिल्ह्यात २०१० मध्ये मुलींचा जन्मदर हा १ हजार मुलांमध्ये ८७६ एवढा होता. २०१६ मध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होवून १ हजार मुलांमध्ये ९४२ मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे.२०२१ मध्ये हा जन्मदर ९९३ वर पोहचला. अशी स्थिती कायम राहणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. २०२२ मध्ये घसरण झाली.

बेटी बचाओं बेटी पढाओ प्रभाव दिसेना...आरोग्य विभागासह प्रशासनाकडून मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजनाही मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरात दहा महिन्यात १७०० जन्म  परभणी शहरात मागील १० महिन्याच्या मनपाच्या जन्म विभागाकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार १०५७ मुलांचा तर ६८६ मुलींचा जन्म झाला असल्याची नोंद आहे.

बालमृत्यू कमी करण्यावर भरगर्भधारणा कालावधीत वेळेवर न घेतले जाणारे उपचार, सकस आहाराकडे होणारे दुर्लक्ष, बालकांच्या जन्मानंतर घेतली न जाणारी काळजी, लसीकरणाकडे मातांचे होणारे दुर्लक्ष, कुपोषण यासह इतर विविध कारणांनी जिल्ह्यात बाल मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गत वर्षभरात १०१ बालकांचा मृत्यू झाला असून, जग पाहण्याआधीच हे बालक देवाघरी गेले आहेत; मात्र २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १८ बालमृत्यू कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला बालमृत्यू रोखण्यात कुठेतरी यश येताना दिसून येत आहे.

वर्षभरात १०१ बालमृत्यूजानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ११९ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधीत १०१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत १८ ने बालमृत्यू कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काम यशस्वी होताना दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी