शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात जन्मदरातील तफावत वाढली; सहा वर्षांत सरासरी हजार मुलांमागे केवळ ८७८ मुली

By मारोती जुंबडे | Updated: December 5, 2023 18:10 IST

२०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे.

परभणी :  जिल्ह्यामध्ये मुले आणि मुली यांच्या जन्मदरामध्ये मोठा फरक आहे. २०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देता का मुलगी अशी स्थिती दिसून येणार आहे. या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. 

जिल्ह्यात २०१० मध्ये मुलींचा जन्मदर हा १ हजार मुलांमध्ये ८७६ एवढा होता. २०१६ मध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होवून १ हजार मुलांमध्ये ९४२ मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे.२०२१ मध्ये हा जन्मदर ९९३ वर पोहचला. अशी स्थिती कायम राहणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. २०२२ मध्ये घसरण झाली.

बेटी बचाओं बेटी पढाओ प्रभाव दिसेना...आरोग्य विभागासह प्रशासनाकडून मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजनाही मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरात दहा महिन्यात १७०० जन्म  परभणी शहरात मागील १० महिन्याच्या मनपाच्या जन्म विभागाकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार १०५७ मुलांचा तर ६८६ मुलींचा जन्म झाला असल्याची नोंद आहे.

बालमृत्यू कमी करण्यावर भरगर्भधारणा कालावधीत वेळेवर न घेतले जाणारे उपचार, सकस आहाराकडे होणारे दुर्लक्ष, बालकांच्या जन्मानंतर घेतली न जाणारी काळजी, लसीकरणाकडे मातांचे होणारे दुर्लक्ष, कुपोषण यासह इतर विविध कारणांनी जिल्ह्यात बाल मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गत वर्षभरात १०१ बालकांचा मृत्यू झाला असून, जग पाहण्याआधीच हे बालक देवाघरी गेले आहेत; मात्र २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १८ बालमृत्यू कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला बालमृत्यू रोखण्यात कुठेतरी यश येताना दिसून येत आहे.

वर्षभरात १०१ बालमृत्यूजानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ११९ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधीत १०१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत १८ ने बालमृत्यू कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काम यशस्वी होताना दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी