शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम 

By मारोती जुंबडे | Updated: September 10, 2022 16:07 IST

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला.

परभणी: ऑगस्ट महिन्यात सतत २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील आठ मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ५० ते ५७ पर्यंत घट अपेक्षित आहे. त्यामुळे  पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ९ सप्टेंबर रोजी पिक विमा कंपनीला दिले आहेत.

खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस, उडीद, तूर, मूग आदी पिकांची पेरणी केली आहे. जून महिना पूर्णतः कोरडा गेल्याने जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने खरीपातील पिके चांगलीच बहरली. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोयाबीन पिकाच्या पीक परिस्थितीचा अहवाल, प्रजन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचा बातम्या, दुष्काळ सदस्य परिस्थिती या आधारे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा कमी आहे, असे जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात निदर्शनास आल्यामुळे हे महसूल मंडळ नुकसान भरपाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आग्रीम रक्कम पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. ही रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून विविध मुदतीत सांभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे.

या मंडळांचा समावेश सतत २१ दिवस पावसाचा खंड झाल्याने जिल्ह्यातील आठ मंडळात ५२ ते ५७ टक्क्यापर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील झरी, शिंगणापूर, जांब व गंगाखेड तालुक्यातील माखणी, पूर्णा तालुक्यातील चुडावा, मानवत तालुक्यातील रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ तर जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळाचा समावेश आहे. या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रकमेचा महिनाभरात लाभ मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी