शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

प्राचीन पौराणिक आणि ऐतिहासिक वारशाचा उपेक्षित ठेवा- नृसिंह तीर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 02:14 IST

मंदिरातील सुंदर रेखीव काम, हेमाडपंथी पद्धतीने खांबाची रचना...

परभणी : जिल्ह्यातील चारठाणा येथील नृसिंह मंदिरातील सुंदर रेखीव काम, हेमाडपंथी पद्धतीने खांबाची रचना व गाभाऱ्यातील शिवलिंग भाविकांच्या आराधनेला हाक देणारी असून, या ठिकाणी नृसिंहाचे वास्तव्य मानले जात असल्याने या स्थानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच पंचक्रोशीत हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.या मंदिराची रचना व पाया वेगळा असून अशा प्रकारचे मंदिर इतरत्र दिसत नाही. या मंदिराच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे उंच पीठासन, भव्य प्रदक्षिणा मार्ग, अलंकरणविरहित पण मजबूत भव्य असे स्तंभ, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी रचना असून रंगशीला चौरस आहे. गाभाºयात शिवलिंग असून अंतराळ लगत उत्तर भागात अजून एक दुसरे शिवलिंग पाहावयास मिळते. मंदिरात पूर्वी नृसिंह मूर्ती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील नृसिंह जिंतूर तालुक्यातील वरूड येथील भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या भक्ताकरिता वरूडला गेला, असे सांगितले जाते. कदाचित वैष्णव भक्तांचा राजाश्रय संपल्यावर असे कथानक तयार झाले असावे, अशी आख्यायिका आहे. चारठाणा येथील नृसिंह मंदिराला दक्षिण आणि उत्तर बाजूने देखील प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेश पूर्व बाजूने होतो. पूर्वाभिमुख मंदिराची पूर्व दिशा आणि गावाची पूर्व दिशा यात थोडा कोनात्मक फरक असून गावाच्या तुलनेत मंदिर तिरपे वाटते. मात्र अनेक वास्तुशास्त्र जाणकारांच्या मते मंदिराची पूर्व दिशा अगदी योग्य साधली गेली आहे. सभामंडपाच्या उत्तर भागात भिंतीत असलेल्या अर्धस्तंभावर पूर्वदिशेला तोंड करून एक स्तंभलेख आहे. एकंदरीत शिलालेखाचा संदर्भ घेतल्यास दुदुंभि संवत्सर १२०२ ला आले होते. यावरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे, याला आधार मिळतो. या मंदिराच्या पूर्व भागात बाहेर झिजत पडलेली शेषशायी विष्णूमूर्ती अतिशय सुंदर असून समुद्रमंथनाचा देखावा कोरलेला आहे. याच भागात एक भग्न यज्ञवराह देखील सापडला असून सध्या तो उत्तर भागातील एक देवकोष्ठात ठेवला गेला आहे.उत्तर चालुक्य काळातील अवशेष!या मंदिराच्या दक्षिण भागात नैर्ऋत्य दिशेला शेतात अजून एक शिवालय सापडले असून, १९९३ ला तिथे उत्खनन झाले होते. मात्र, निधीअभावी ते काम अपूर्ण राहिले. मंदिरालगत दक्षिण भागात आणखी २ मंदिरांचे अवशेष सापडले असून, तिथे देखील शिवपिंडी दिसून येतात. यादव काळापूर्वी असलेल्या वैभवशाली उत्तर चालुक्य काळाचे अवशेष या गावाला प्राचीन इतिहास आहे, हे सिद्ध करतात.संशोधनाची गरजचारठाण्याचा प्राचीन इतिहास हा नदीकिनारी असलेल्या मंदिर परिसरात दडलेला असून शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून अभ्यास व्हायला हवा. कारण कोणतीही संस्कृती नदीकिनारीच विकसित झालेली पाहावयास मिळते. या दृष्टीने नवीन संशोधन व मांडणी व्हायला हवी. त्यासाठी सर्व मंदिर स्थापत्यप्रेमींनी पुढाकार घेऊन गावाला जागतिक वारशात समावेशासाठी प्रयत्न करावेत, असे मत मूर्तिशास्त्र अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांनी व्यक्त केले.