शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सुविधांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा देण्यात येत आहे. ...

कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या

परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा देण्यात येत आहे. मात्र रात्री पिकांना सिंचन करताना अनेक वेळा कृषिपंपाजवळच्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर विंचू, सर्पदंश व रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेना

परभणी : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे यावर्षी अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, या पीक लागवडीवर केलेला सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई शासनाने भरून काढणे अपेक्षित असताना केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मदत देऊन ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत.

रस्त्याची दुरवस्था

परभणी : पाथरी-सोनपेठ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात वाहने फसली आहेत. हा रस्ता वर्दळीचा असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ डागडुजी केली जात आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

सिंचन वाढले

परभणी : जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी, मासोळी, ढालेगाव, मुदगल, आंबेगाव, डिग्रस, तलाव बंधाऱ्यासह छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी आदी नद्या प्रवाही आहेत. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकांसाठी शेतकरी सिंचन करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सिंचन वाढले आहे.

पीक कर्जाची गती वाढवा

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना प्रशासनाने ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ १.८९ टक्केच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.

.

''मागेल त्याला शेततळे''साठीचे पोर्टल बंद

परभणी : मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार हे पोर्टल ऑनलाईन नोंदणीसाठी मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, शेततळे घेण्यासाठी महाईसेवा केंद्राकडे चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.