शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

सुविधांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST

कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा देण्यात येत आहे. ...

कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या

परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा देण्यात येत आहे. मात्र रात्री पिकांना सिंचन करताना अनेक वेळा कृषिपंपाजवळच्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर विंचू, सर्पदंश व रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेना

परभणी : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे यावर्षी अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, या पीक लागवडीवर केलेला सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई शासनाने भरून काढणे अपेक्षित असताना केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मदत देऊन ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत.

रस्त्याची दुरवस्था

परभणी : पाथरी-सोनपेठ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात वाहने फसली आहेत. हा रस्ता वर्दळीचा असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ डागडुजी केली जात आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

सिंचन वाढले

परभणी : जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी, मासोळी, ढालेगाव, मुदगल, आंबेगाव, डिग्रस, तलाव बंधाऱ्यासह छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी आदी नद्या प्रवाही आहेत. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकांसाठी शेतकरी सिंचन करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सिंचन वाढले आहे.

पीक कर्जाची गती वाढवा

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना प्रशासनाने ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ १.८९ टक्केच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.

.

''मागेल त्याला शेततळे''साठीचे पोर्टल बंद

परभणी : मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार हे पोर्टल ऑनलाईन नोंदणीसाठी मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, शेततळे घेण्यासाठी महाईसेवा केंद्राकडे चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.