शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हिंमत असेल तर शिवसेनेने स्वबळावर लढावे; चंद्रकांत पाटलांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:19 IST

Chandrakant Patil News : युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

ठळक मुद्देया सरकारचे दररोज घोटाळे बाहेर पडत आहेत

परभणी : भाजपा-शिवसेनेची ( BJP- Shiv Sena ) युती तुटल्यानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपाची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने हिम्मत असेल तर स्वबळावर लढून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिले आहे.

परभणीत भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी २१ ऑक्टोबर रोजी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो अथवा इतर निवडणुकांमध्ये भाजपा एक नंबरवर असून, शिवसेना ४ नंबरवर फेकली गेली आहे. शिवसेनेने ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली ते पक्षही या निवडणुकांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीचे उत्तम उदाहरण आहे. याच निवडणुकीप्रमाणे देगलूर विधानसभेची निवडणूकही भाजपा जिंकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘या सरकारचे दररोज घोटाळे बाहेर पडत असून, किरीट सोमय्या यांनी कालच ग्रामविकास विभागाचा पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाला ही निविदा रद्द करावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर किरीट सोमय्यांना बोलवाभाजपाचे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढत असून, त्यांच्यामुळे सरकारची झोप उडाली आहे. लवकरच किरीट सोमय्या यांचा नांदेड जिल्हा दौरा आहे. परभणी जिल्ह्यातही असे काही घोटाळे असतील तर किरीट सोमय्यांना येथे बोलवा, असे चंद्रकांत पाटील म्हणताच एकच हशा पिकला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना