शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

हिंमत असेल तर शिवसेनेने स्वबळावर लढावे; चंद्रकांत पाटलांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:19 IST

Chandrakant Patil News : युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

ठळक मुद्देया सरकारचे दररोज घोटाळे बाहेर पडत आहेत

परभणी : भाजपा-शिवसेनेची ( BJP- Shiv Sena ) युती तुटल्यानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपाची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने हिम्मत असेल तर स्वबळावर लढून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिले आहे.

परभणीत भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी २१ ऑक्टोबर रोजी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो अथवा इतर निवडणुकांमध्ये भाजपा एक नंबरवर असून, शिवसेना ४ नंबरवर फेकली गेली आहे. शिवसेनेने ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली ते पक्षही या निवडणुकांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीचे उत्तम उदाहरण आहे. याच निवडणुकीप्रमाणे देगलूर विधानसभेची निवडणूकही भाजपा जिंकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘या सरकारचे दररोज घोटाळे बाहेर पडत असून, किरीट सोमय्या यांनी कालच ग्रामविकास विभागाचा पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाला ही निविदा रद्द करावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर किरीट सोमय्यांना बोलवाभाजपाचे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढत असून, त्यांच्यामुळे सरकारची झोप उडाली आहे. लवकरच किरीट सोमय्या यांचा नांदेड जिल्हा दौरा आहे. परभणी जिल्ह्यातही असे काही घोटाळे असतील तर किरीट सोमय्यांना येथे बोलवा, असे चंद्रकांत पाटील म्हणताच एकच हशा पिकला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना