शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न

By राजन मगरुळकर | Updated: August 6, 2023 18:12 IST

मुख्य उद्घाटनापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून श्रेय वादाची लढाई अन् आगामी निवडणुकीची साखर पेरणीची संधी नेत्यांनी सोडली नाही.

परभणी : अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत परभणी रेल्वे स्थानक पुनर्विकासाच्या पायाभरणीचा उद्घाटन कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांच्या कलगीतुऱ्याने रंगला. मुख्य उद्घाटनापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून श्रेय वादाची लढाई अन् आगामी निवडणुकीची साखर पेरणीची संधी नेत्यांनी सोडली नाही.

भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा आढावा घेत विकास कामांसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी परभणीकडे कधीही दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले. मागील लोकसभा, विधानसभेत परभणीला अपेक्षित निधी दिला. खासदार सुद्धा मोदींच्या लाटेतच निवडून आल्याचे भरोसे म्हणाले. हाच धागा पकडून खासदार संजय जाधव यांनी भाषणातून मी जर मोदी लाटेत निवडून आलो तर तुम्ही याच लाटेत कसे काय पडलात, असा प्रतिप्रश्न भरोसे यांना केला. मोदी आमचे म्हणून तुम्ही मोदींचे महत्त्व कमी करताय, त्यांना लहान बनवू नका, ते देशाचे पंतप्रधान असून सगळ्याचे आहेत. केवळ भाजपचे आणि तुमचे नाही असे बोलून खा. जाधव यांनी भरोसे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले.

परभणी रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सकाळी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत परभणी जंक्शनच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार विफ्लव बाजोरिया, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सुनील देशमुख, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, मंगला मुदगलकर, सुप्रिया कुलकर्णी, मोकिंद खिल्लारे, अतुल सरोदे यांच्यासह नांदेड रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

बाजोरिया पिता-पुत्राच्या जोडीने वेधले लक्ष

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार विप्लव बाजोरिया हे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत वडील माजी आ. गोपीकिशन बाजोरिया हेही होते. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बराच वेळ मान्यवर व्यासपीठाच्या खाली व्हीआयपी कक्षात स्थानापन्न होते. वेळोवेळी विनंती केल्यानंतर व्यासपीठावर जाण्यासाठी गोपीकिशन बाजोरिया तयार झाले. व्यासपीठावर खा. संजय जाधव यांच्या बाजूला विप्लव बाजोरिया आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या खुर्चीवर गोपीकिशन बाजोरिया व आनंद भरोसे यांची चर्चा सुरू होती. या पिता पुत्राच्या जोडीने व चर्चेने सुद्धा अनेकांचे लक्ष वेधले होते.

खासदार मोदींच्या लाटेत निवडून आले : भरोसे

भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील चार वर्षात कलम ३७० तसेच राम मंदिर आणि आजचा हा ५०८ रेल्वे स्थानकांचा सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. परभणीसह अन्य रेल्वे स्थानकांच्या समावेशाबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांनी परभणीकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. खासदार साहेब सुद्धा मोदींच्या लाटेत निवडून आले. देशात लोकसभा आणि विधानसभेला मोदींची लाट होती असे सांगण्यासही भरोसे विसरले नाहीत.

मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो : जाधव

पूर्णा येथील विविध स्थलांतरित होणारे प्रकल्प थांबविणे आवश्यक आहे. किमान पूर्णामध्ये इलेक्ट्रिक लोको शेड व्हावा. आंध्र, दक्षिण मध्य रेल्वे विभागातील अधिकारी परभणीत सुविधा देत नाहीत, ही चुकीची बाब आहे. कंत्राटी सुद्धा ठाण मांडून आहेत. याकडे सुद्धा रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भरोसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जाधव म्हणाले, मी मोदी लाटेत निवडून आलो तर तुम्ही मोदी लाटेत कसे काय पडलात. निवडणुका येतात, जातात आता आगामी काळातही निवडणूक राहणार आहे. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. तुम्ही तुमची ताकद दाखवा. या निवडणुकीत आम्ही पडलो तर तुमची ताकद मान्य करू आणि जर आम्ही जिंकलो तर याआधी तुमची ताकद नव्हती, हे तुम्ही मान्य करा. असे म्हणून त्यांनी या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले. हे राजकीय व्यासपीठ नाही. मात्र, ओघाने तुम्ही बोललात, त्या बोलण्याला मी प्रत्युत्तर दिले. कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणून खा.जाधव यांनी मनोगत पूर्ण केले.

टॅग्स :parbhani-acपरभणी