शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शाळा बंद असल्याने मानव विकासचा निधी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मानव विकास विभागाच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून मानव विकास ...

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मानव विकास विभागाच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून मानव विकास बसेस चालविल्या जातात. दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर त्या-त्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मानव विकासच्या बसेचा मार्ग निश्चित केला जातो. या मार्गानुसार होणाऱ्या फेऱ्या लक्षात घेऊन मानव विकास मिशनच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाला निधी उपलब्ध केला जातो. या निधीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे मानव विकासाची बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात मानव विकास मिशनच्या एकूण ६३ बसेस आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी ७ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ७ लाख ४ हजार रुपये प्रतिबस याप्रमाणे मानव विकास मिशनच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाला निधी दिला जातो. २०१९-२० मध्ये जिल्ह्यासाठी ४ कोटी ४३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर २०२०-२१ मध्ये तीन महिने ही बससेवा चालविण्यात आली. त्यात १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी वापरण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी देखील मानव विकासची सेवा सुरू होते की नाही, याबद्दल साशंकता असून, निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

१८.९३ लाखांचा केला दर

मानव विकास मिशनसाठी आतापर्यंत प्रति बस ७ लाख ४ हजार रुपये या प्रमाणे निधी मंजूर केला जात होता. दरम्यानच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाने तिकीट भाडेही वाढविले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, मानव विकास मिशनने ३० मार्च २०२१ रोजी अध्यादेश काढून मानव विकासच्या बसेससाठी १८.९३ लाख रुपये प्रतिबस या दराने एस.टी. महामंडळाला निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर शाळा बंद असल्याने नवीन दराप्रमाणे अद्याप महामंडळाला हा निधी मिळाला नाही. मागील वर्षीचा त्यास अपवाद या आहे. यावर्षात ३ महिने बससेवा सुरू होती. त्याचा एरिएसचा १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी महामंडळाला प्राप्त झाला आहे.

इतर योजना मात्र सुरूच

मानव विकासच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जातात. बससेवेसाठी दोन वर्षांपासून निधी मिळाला नसला तरी महिलांच्या आरोग्यासाठी घेतलेले जाणारे आरोग्य शिबिरे, गरोदर मातांसाठी असलेली बुडीत मजुरी या योजना जिल्ह्यात सध्या राबविल्या जात आहेत.