शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

परभणी जंक्शन येथून सध्या २२ ते २४ रेल्वेची ये-जा सुरू आहे. या सर्व रेल्वे पूर्वीसुद्धा धावत होत्या. त्याच ...

परभणी जंक्शन येथून सध्या २२ ते २४ रेल्वेची ये-जा सुरू आहे. या सर्व रेल्वे पूर्वीसुद्धा धावत होत्या. त्याच रेल्वेंना विशेष रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे तिकिटाचे दर वाढले. मात्र, प्रवासाचा वेळ आणि इतर सुविधा मात्र प्रवाशांना मिळेनाशा झाल्या आहेत. नांदेड तसेच औरंगाबाद जाण्यासाठी पूर्वी लागणाऱ्या साधारण तिकिटाच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

नांदेड-मुंबई तपोवन

नांदेड-बंगुळरू

नांदेड-पनवेल

नांदेड-पुणे

सिकंदराबाद-मनमाड

सिकंदराबाद-मुंबई

औरंगाबाद-हैदराबाद

नांदेड-अमृतसर

नांदेड-मुंबई राज्यराणी

तिकिटात दुप्पट फरक

कोेरोनापूर्वी धावणाऱ्या रेल्वेला नांदेडचे एक्स्प्रेस तिकीट ३५ रुपये होते. सध्या हेच तिकीट स्थानकावर आरक्षण करून ५० रुपये, तर ऑनलाईन आरक्षण काढल्यास ७० रुपये लागत आहेत.

औरंगाबादच्या बाबतीत साधारण तिकीट ७० रुपये होते. सध्या आरक्षण काढून सिटिंगचे तिकीट १०० रुपये, तर स्लीपरसाठी १४० रुपये मोजावे लागत आहेत. यासह एसीच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

मुंबईला जाण्यासाठी केवळ एक्स्प्रेसला १७० रुपये लागत होते. आता तपोवनला हेच तिकीट २६० रुपये लागत आहेत, तर मुंबईला जाण्यासाठी स्लीपरला ३७० रुपये लागत होते. सध्या हेच तिकीट ५०० रुपये एवढे झाले आहे.

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

पुणे - मुंबईसारख्या ठिकाणी जाण्यास आरक्षणाची गरज असते. मात्र, परभणीहून नांदेड, पूर्णा, सेलू, जालना या मार्गावर दररोज ये - जा करणाऱ्यांसह ऐनवेळी प्रवासाला जाणाऱ्यांची आरक्षणाच्या सक्तीमुळे अडचण होत आहे. याकरिता रेल्वे विभागाने तिकीट काऊंटर सुरू करून साधारण तिकीट दर लागू करून प्रवासाला जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

प्रवासी म्हणतात

पॅसेंजर रेल्वे सुरू नाहीत. याचा फटका तर बसत आहे. मात्र, त्याचबरोबर दररोज अप-डाऊन करण्यासाठी पासही दिला जात नाही. तसेच जेव्हा ऐनवेळी प्रवासाला जायचे तेव्हा आरक्षण मिळत नाही. अशा वेळी अडचण होते. यासाठी साधारण तिकीट सुरू करावे. गावाला येण्या - जाण्यातच दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. - विनोद काळे.

नांदेडहून परभणीला येण्यासाठी दररोज आरक्षण काढणे परवडत नाही. यामुळे खासगी वाहनाने तसेच बसने ये-जा करावी लागत आहे. रेल्वेचा पर्याय सोपा असताना आरक्षणाच्या सक्तीमुळे प्रवासाला जाणे कठीण होऊन बसले आहे. यात अतिरिक्त पैसे जात आहेत. याचा विचार करून साधारण तिकीटप्रणाली लागू करावी. - गोपाल यादव.