शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

परभणी जंक्शन येथून सध्या २२ ते २४ रेल्वेची ये-जा सुरू आहे. या सर्व रेल्वे पूर्वीसुद्धा धावत होत्या. त्याच ...

परभणी जंक्शन येथून सध्या २२ ते २४ रेल्वेची ये-जा सुरू आहे. या सर्व रेल्वे पूर्वीसुद्धा धावत होत्या. त्याच रेल्वेंना विशेष रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे तिकिटाचे दर वाढले. मात्र, प्रवासाचा वेळ आणि इतर सुविधा मात्र प्रवाशांना मिळेनाशा झाल्या आहेत. नांदेड तसेच औरंगाबाद जाण्यासाठी पूर्वी लागणाऱ्या साधारण तिकिटाच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे

नांदेड-मुंबई तपोवन

नांदेड-बंगुळरू

नांदेड-पनवेल

नांदेड-पुणे

सिकंदराबाद-मनमाड

सिकंदराबाद-मुंबई

औरंगाबाद-हैदराबाद

नांदेड-अमृतसर

नांदेड-मुंबई राज्यराणी

तिकिटात दुप्पट फरक

कोेरोनापूर्वी धावणाऱ्या रेल्वेला नांदेडचे एक्स्प्रेस तिकीट ३५ रुपये होते. सध्या हेच तिकीट स्थानकावर आरक्षण करून ५० रुपये, तर ऑनलाईन आरक्षण काढल्यास ७० रुपये लागत आहेत.

औरंगाबादच्या बाबतीत साधारण तिकीट ७० रुपये होते. सध्या आरक्षण काढून सिटिंगचे तिकीट १०० रुपये, तर स्लीपरसाठी १४० रुपये मोजावे लागत आहेत. यासह एसीच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

मुंबईला जाण्यासाठी केवळ एक्स्प्रेसला १७० रुपये लागत होते. आता तपोवनला हेच तिकीट २६० रुपये लागत आहेत, तर मुंबईला जाण्यासाठी स्लीपरला ३७० रुपये लागत होते. सध्या हेच तिकीट ५०० रुपये एवढे झाले आहे.

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

पुणे - मुंबईसारख्या ठिकाणी जाण्यास आरक्षणाची गरज असते. मात्र, परभणीहून नांदेड, पूर्णा, सेलू, जालना या मार्गावर दररोज ये - जा करणाऱ्यांसह ऐनवेळी प्रवासाला जाणाऱ्यांची आरक्षणाच्या सक्तीमुळे अडचण होत आहे. याकरिता रेल्वे विभागाने तिकीट काऊंटर सुरू करून साधारण तिकीट दर लागू करून प्रवासाला जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

प्रवासी म्हणतात

पॅसेंजर रेल्वे सुरू नाहीत. याचा फटका तर बसत आहे. मात्र, त्याचबरोबर दररोज अप-डाऊन करण्यासाठी पासही दिला जात नाही. तसेच जेव्हा ऐनवेळी प्रवासाला जायचे तेव्हा आरक्षण मिळत नाही. अशा वेळी अडचण होते. यासाठी साधारण तिकीट सुरू करावे. गावाला येण्या - जाण्यातच दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. - विनोद काळे.

नांदेडहून परभणीला येण्यासाठी दररोज आरक्षण काढणे परवडत नाही. यामुळे खासगी वाहनाने तसेच बसने ये-जा करावी लागत आहे. रेल्वेचा पर्याय सोपा असताना आरक्षणाच्या सक्तीमुळे प्रवासाला जाणे कठीण होऊन बसले आहे. यात अतिरिक्त पैसे जात आहेत. याचा विचार करून साधारण तिकीटप्रणाली लागू करावी. - गोपाल यादव.