शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या ...

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या प्रमुख तीन रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा लागली आहे. निधी उपलब्ध असूनही केवळ उदासिनतेतून या रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याची सत्य परिस्थिती आहे. राज्य स्तरावर चर्चेत आलेल्या परभणी-गंगाखेड व परभणी-जिंतूर या रस्त्यांच्या कामासाठी १७ एप्रिल २०१८ रोजी देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली होती. त्यामध्ये परभणी-गंगाखेड रस्त्यासाठी २०२ कोटी रुपये तर परभणी-जिंतूर रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा समावेश होता. गडकरी यांच्या घोषणेनंतर दोन्ही रस्त्यांची कामे सुरु झाली; परंतु, अडीच वर्षानंतरही ती पूर्ण झालेली नाहीत. यासाठी हे काम करणारे कंत्राटदारच जबाबदार आहेत. तसेच त्यांच्याकडून काम करुन घेण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारीही अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर प्रशासनावर अंकुश ठेवून विकासकामे पूर्ण करुन घेण्यात लोकप्रतिनिधीही तितकेच अपयशी ठरले आहेत. परिणामी जिल्हावासियांचा या रस्त्यांवरील खड्ड्यांमधून होणारा प्रवास आजही थांबलेला नाही. अशीच काहीशी अवस्था मानवत रोड ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६२ची आहे. या रस्त्यासाठी तब्बल १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही सातत्याने कंत्राटदार बदलल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नूतन वर्षात तरी या तिन्ही प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होतील व जिल्हावासियांचा प्रवास चांगल्या रस्त्यांवरुन होईल, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे.

रस्त्यांच्या कामावर ३३० कोटींचा खर्च

परभणी जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांवर १४३ कोटी १९ लाख ७७ हजार, २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४१ कोटी ९२ लाख रुपये, जिल्हा नियोजन समितीकडून २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात १२२ कोटी ८६ लाख ८ हजार रुपये तसेच ३०५४, २४१९ अंतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात २२ कोटी ५० लाख ७८ हजार रुपये असा एकूण ३३० कोटी ४८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची स्थिती दयनीय आहे.