शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या ...

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या प्रमुख तीन रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा लागली आहे. निधी उपलब्ध असूनही केवळ उदासिनतेतून या रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याची सत्य परिस्थिती आहे. राज्य स्तरावर चर्चेत आलेल्या परभणी-गंगाखेड व परभणी-जिंतूर या रस्त्यांच्या कामासाठी १७ एप्रिल २०१८ रोजी देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली होती. त्यामध्ये परभणी-गंगाखेड रस्त्यासाठी २०२ कोटी रुपये तर परभणी-जिंतूर रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा समावेश होता. गडकरी यांच्या घोषणेनंतर दोन्ही रस्त्यांची कामे सुरु झाली; परंतु, अडीच वर्षानंतरही ती पूर्ण झालेली नाहीत. यासाठी हे काम करणारे कंत्राटदारच जबाबदार आहेत. तसेच त्यांच्याकडून काम करुन घेण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारीही अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर प्रशासनावर अंकुश ठेवून विकासकामे पूर्ण करुन घेण्यात लोकप्रतिनिधीही तितकेच अपयशी ठरले आहेत. परिणामी जिल्हावासियांचा या रस्त्यांवरील खड्ड्यांमधून होणारा प्रवास आजही थांबलेला नाही. अशीच काहीशी अवस्था मानवत रोड ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६२ची आहे. या रस्त्यासाठी तब्बल १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही सातत्याने कंत्राटदार बदलल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नूतन वर्षात तरी या तिन्ही प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होतील व जिल्हावासियांचा प्रवास चांगल्या रस्त्यांवरुन होईल, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे.

रस्त्यांच्या कामावर ३३० कोटींचा खर्च

परभणी जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांवर १४३ कोटी १९ लाख ७७ हजार, २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४१ कोटी ९२ लाख रुपये, जिल्हा नियोजन समितीकडून २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात १२२ कोटी ८६ लाख ८ हजार रुपये तसेच ३०५४, २४१९ अंतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात २२ कोटी ५० लाख ७८ हजार रुपये असा एकूण ३३० कोटी ४८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची स्थिती दयनीय आहे.