शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या ...

परभणी: गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना नूतन वर्षात जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरोफाटा या प्रमुख तीन रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा लागली आहे. निधी उपलब्ध असूनही केवळ उदासिनतेतून या रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याची सत्य परिस्थिती आहे. राज्य स्तरावर चर्चेत आलेल्या परभणी-गंगाखेड व परभणी-जिंतूर या रस्त्यांच्या कामासाठी १७ एप्रिल २०१८ रोजी देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली होती. त्यामध्ये परभणी-गंगाखेड रस्त्यासाठी २०२ कोटी रुपये तर परभणी-जिंतूर रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा समावेश होता. गडकरी यांच्या घोषणेनंतर दोन्ही रस्त्यांची कामे सुरु झाली; परंतु, अडीच वर्षानंतरही ती पूर्ण झालेली नाहीत. यासाठी हे काम करणारे कंत्राटदारच जबाबदार आहेत. तसेच त्यांच्याकडून काम करुन घेण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारीही अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर प्रशासनावर अंकुश ठेवून विकासकामे पूर्ण करुन घेण्यात लोकप्रतिनिधीही तितकेच अपयशी ठरले आहेत. परिणामी जिल्हावासियांचा या रस्त्यांवरील खड्ड्यांमधून होणारा प्रवास आजही थांबलेला नाही. अशीच काहीशी अवस्था मानवत रोड ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६२ची आहे. या रस्त्यासाठी तब्बल १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही सातत्याने कंत्राटदार बदलल्याने काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नूतन वर्षात तरी या तिन्ही प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होतील व जिल्हावासियांचा प्रवास चांगल्या रस्त्यांवरुन होईल, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे.

रस्त्यांच्या कामावर ३३० कोटींचा खर्च

परभणी जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांवर १४३ कोटी १९ लाख ७७ हजार, २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४१ कोटी ९२ लाख रुपये, जिल्हा नियोजन समितीकडून २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात १२२ कोटी ८६ लाख ८ हजार रुपये तसेच ३०५४, २४१९ अंतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ याकाळात २२ कोटी ५० लाख ७८ हजार रुपये असा एकूण ३३० कोटी ४८ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची स्थिती दयनीय आहे.