शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:39 IST

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाने नोंदविली मागणी, प्रवाशांची  तारांबळअतिवृष्टीने पिकांबरोबरच जिल्ह्यात रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात हानी

परभणी : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता भासणार असून तशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीने पिकांबरोबरच जिल्ह्यात रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही पूल वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे सततच्या पावसामुळे  जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. जून ते ऑक्टोबर या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील ७२५.८४ कि.मी. लांबीच्या ऱस्त्यांवर खड्डे पडले असून ते खड्डे बुजविण्यासाठी १४ कोटी ५२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ३.०७ कि.मी. लांबीचे रस्ते वाहून गेले आहेत. पुलाच्या ६६ मोऱ्या वाहून गेल्या असून, ५.३० कि.मी.चे डोंगरी भागातील रस्ते वाहून गेले आहेत.  ४८.६८  कि.मी.चे रस्ते क्षतीग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी १४ कोटी ५२ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. २०१९ ते २०२१ या दोन वर्षात पर्जन्यमानामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी ८६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसेच २०१९ ते २०२१ या काळात मंजूर झालेले रस्ते आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांसाठी निधी लागणार आहे. एकंदर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता असून हा निधी जिल्ह्याला उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी सार्वजनिक  बांधकाम विभागाने शासनाकडे नोंदविली आहे. केंद्राकडेही ७ कोटीची मागणीजिल्ह्यातील काही रस्ते केंद्र शासनाच्या अख्त्यारित आहेत. त्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जिल्ह्यातील १४३.७४५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ४४ लाख रुपये.n प्रमुख जिल्हा मार्गावरील पूरहानीग्रस्त झालेल्या ५८२ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ८२ लाख असा एकूण ७ कोटी २६ लाख रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक असल्याचे बांधकाम  विभागाने नमूद केले आहे.

७०० कि.मी.च्या रस्त्यावर खड्डे प्रमुख राज्यमार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग अशा एकूण तीनही विभागातील रस्त्यांची लांबी १६३९ कि.मी. एवढी आहे. त्यामध्ये ११२.४१ कि.मी.चे प्रमुख राज्य मार्ग जिल्ह्यातून जातात. ५०८.६५ कि.मी.चे राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गाची लांबी १०१७.९७  कि.मी.  एवढी आहे. या एकूण लांबीच्या रस्त्यांपैकी अतिवृष्टीमुळे तब्बल ७२५.८४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रस्त्यांपैकी ४४ टक्के रस्ते खड्डेमय असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाparabhaniपरभणीfundsनिधी