शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! परभणीतून जाणाऱ्या ४९ किलोमीटर रेल्वेमार्गाची ईलेक्ट्रीफिकेशन चाचणी पूर्ण

By राजन मगरुळकर | Updated: January 3, 2024 18:18 IST

परभणी-मिरखेल, मानवत रोड ते उस्मानपुर मार्गावर ट्रायल

परभणी : दक्षिण मध्ये रेल्वे विभागातील विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतलेली आहे. यामध्ये जवळपास अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. यात शनिवारी परभणी ते मिरखेल या १६ किलोमीटर मार्गावर आणि मानवत रोड ते उस्मानपुर या ३३ किलोमीटर अशा एकूण ४९ किलोमीटर मार्गाचे सीआरएस इलेक्ट्रिसिटी ट्रायल पूर्ण करण्यात आले. या चाचणीसाठी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिनिसिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर पी.डी.मिश्रा यांची उपस्थिती होती.

परभणी येथून परळी जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील ६३ किलोमीटरचे विद्युतीकरण मागील वर्षी पूर्ण झाले आहे. या मार्गावर विद्युत प्रवाह सोडण्यात आला असून त्याची इलेक्ट्रिफिकेशन ट्रायल सुद्धा पूर्ण झाली आहे. याशिवाय परभणी-पूर्णा या मार्गावर मिरखेल रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून १६ किलोमीटर मार्गाची ट्रायल चाचणी शनिवारी झाली. मानवत रोड ते उस्मानपुर या ३३ किलोमीटर मार्गावर चाचणी घेण्यात आली. आता केवळ परभणी ते मानवत रोड रेल्वे मार्गाचे काम काही प्रमाणात बाकी आहे. या शिवाय पूर्णा ते मिरखेल स्थानकादरम्यान १२ किलोमीटर अंतरावर फाउंडेशन वर्क सुरू आहे.

शनिवारी रेल्वे इलेक्ट्रिकेशन (कोअर) सिकंदराबाद विभागाचे प्रिन्सिपल चिफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर पी.डी.मिश्रा यांच्यासह पथक विद्युत चाचणीसाठी या मार्गावर आले होते. इलेक्ट्रिक जोडणीचे इंजिन लावून गती आणि अन्य तांत्रिक बाबी तपासून त्यांच्या उपस्थितीत हे ट्रायल घेण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप समोर आला नसला तरी ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आगामी काळामध्ये जलदगतीने काम पूर्ण करून उर्वरित ठिकाणची कामे केली जाणार आहेत. या वर्षात तरी किमान परभणी -परळी, परभणी-पूर्णा, परभणी-मानवत रोड एकत्रित सुरु झाल्यास पूर्णा येथूनच विद्यूतीकरणाच्या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरवात होऊ शकते.

२५ हजार व्होल्टचा सोडला करंटदक्षिण मध्य रेल्वे मार्गावर परभणी जंक्शन येथून सध्या परळीकडे जाणारा मार्ग, सोबतच मिरखेलकडे जाणारा मार्ग आणि मानवत रोडकडे जाणारा मार्ग अशा तीनही मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दोन मार्गावरील काम पूर्ण झाले तर मानवत रोड मार्गावरील काम अजून पूर्ण होणे बाकी आहे. जेथे काम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा याबाबत काळजी घ्यावी, रेल्वे रुळ ओलांडताना सोबतच कोणत्याही विद्यूत खांबाला हात लावू नये, असे आवाहन दमरे विभाग तसेच परभणी आरपीएफच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणी