शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 13:01 IST

दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू

जिंतूर ( परभणी ) : स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलवरील तिघा भावांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील अकोली पुलावर घडली. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (१८ ), योगेश काशिनाथ म्हेत्रे ( १५ ), रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे ( २० ) अशी मृतांची नावे आहेत. मृतातील दोघे सख्खे तर एक चुलत भाऊ होता. जिंतूरपासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या पुलाजवळ असणारा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 

मालेगाव येथील अभिषेक, योगेश आणि रामप्रसाद हे तिघे भाऊ आज सकाळी जिंतूरमधील भाजीमंडीमध्ये असणाऱ्या स्वतःच्या किराणा दुकानावर दुचाकीवरून (एम एस 26- 2834 ) जात होते. जिंतूरपासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेल्या अकोलीजवळील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकने  ( एम एच18 -बि जि 6270) दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकखाली आल्याने तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ऐवढा भीषण होता की, त्याठिकाणी हाडामासाचा सडा पडला होता. 

अपघातानंतर अकोली गावातील ग्रामस्थांनी या संदर्भातली माहिती जिंतूर पोलिसांना दिली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ आकात, पांडुरंग मुसळे ,तुकाराम शेटे, ज्ञानेश्वर पांचाळ, रुग्णवाहिका चालक घुगे यांनी मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली. 

खड्डा चुकवताना झाला अपघात?अकोली पुलाजवळ मोठा खड्डा आहे. हा खड्डा चुकवताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले आणि याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर खड्डे आणि गरोधक यांमुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी गेले आहेत. यामुळे या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार हेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी