शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांना देवदर्शनाला जाण्यासाठी हवाय ई-पास..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

परभणी : लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी नागरिकांनी अनेक वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यात देवदर्शनाच्या नावाखाली ई- पासची मागणी झाली, ...

परभणी : लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी नागरिकांनी अनेक वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यात देवदर्शनाच्या नावाखाली ई- पासची मागणी झाली, मात्र न पटणारी कारणे दिल्याने पोलीस प्रशासनाने ४५ टक्के नागरिकांचे ई-पास प्रमाणपत्र रद्द केले आहेत.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र या काळात अत्यावश्यक कामासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. या पासवर जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करता येत होता. येथील पोलीस प्रशासनाकडून हा ई-पास मिळवावा लागत होता. मागच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडे २३ हजार ३७४ जणांनी अर्ज केले. मात्र यातील काही अर्जांमध्ये देवदर्शनासाठी जिल्ह्याबाहेर जाणे, मित्रांना भेटायला जाणे अशी न पटणारी कारणे दिली होती.

पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने न पटणारी कारणे देत ई-पासची मागणी केलेले सर्व अर्ज अमान्य केले आहेत. दोन महिन्यांच्या या काळात ४५ टक्के पासेस प्रशासनाने रद्द केले आहेत.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही

n कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही काही जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी मिळावी यासाठी कोणतीही कारणे अर्जामध्ये नमूद केली.

विशेष म्हणजे, दवाखाना, अंत्यविधी य सारख्या अत्यावश्यक कामांसाठीच ई-पास घेणे आवश्यक होते. मात्र पोलीस प्रशासनाकडे आलेल्या अर्जांमध्ये न पटणारी कारणे दिल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनमुळे देवस्थाने बंद असताना देवदर्शनासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याचे आहे त्यासाठी ई-पास हवा, असा अर्ज प्रशासनाकडे दाखल झाला होता. तसेच इतर क्षुल्लक कारणांसाठीही पासची मागणी झाली.

सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?

दोन महिन्यांच्या काळात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या पाहता, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सर्वांचीच इमर्जन्सी कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सुविधेचा गैरफायदा घेऊन अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठीही काही जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने या सर्वांचे अर्ज अमान्य केले आहेत.

कसून तपासणीनंतरच दिला गेला पास

ई-पास देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात दिलेली कारणे खरेच अत्यावश्यक वाटणारी असतील आणि त्याअनुषंगाने संबंधित अर्जदाराने कागदपत्र जोडले असतील तरच तो पास मंजूर केला जातो. त्यामुळे विनाकारण पास घेऊन जिल्ह्याबाहेर फिरणाऱ्यांची संख्या घटली.