शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कुटुंबीयांना देवदर्शनाला जाण्यासाठी हवाय ई-पास..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

परभणी : लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी नागरिकांनी अनेक वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यात देवदर्शनाच्या नावाखाली ई- पासची मागणी झाली, ...

परभणी : लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी नागरिकांनी अनेक वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यात देवदर्शनाच्या नावाखाली ई- पासची मागणी झाली, मात्र न पटणारी कारणे दिल्याने पोलीस प्रशासनाने ४५ टक्के नागरिकांचे ई-पास प्रमाणपत्र रद्द केले आहेत.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र या काळात अत्यावश्यक कामासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. या पासवर जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करता येत होता. येथील पोलीस प्रशासनाकडून हा ई-पास मिळवावा लागत होता. मागच्या दोन महिन्यांत प्रशासनाकडे २३ हजार ३७४ जणांनी अर्ज केले. मात्र यातील काही अर्जांमध्ये देवदर्शनासाठी जिल्ह्याबाहेर जाणे, मित्रांना भेटायला जाणे अशी न पटणारी कारणे दिली होती.

पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने न पटणारी कारणे देत ई-पासची मागणी केलेले सर्व अर्ज अमान्य केले आहेत. दोन महिन्यांच्या या काळात ४५ टक्के पासेस प्रशासनाने रद्द केले आहेत.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही

n कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही काही जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी मिळावी यासाठी कोणतीही कारणे अर्जामध्ये नमूद केली.

विशेष म्हणजे, दवाखाना, अंत्यविधी य सारख्या अत्यावश्यक कामांसाठीच ई-पास घेणे आवश्यक होते. मात्र पोलीस प्रशासनाकडे आलेल्या अर्जांमध्ये न पटणारी कारणे दिल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनमुळे देवस्थाने बंद असताना देवदर्शनासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याचे आहे त्यासाठी ई-पास हवा, असा अर्ज प्रशासनाकडे दाखल झाला होता. तसेच इतर क्षुल्लक कारणांसाठीही पासची मागणी झाली.

सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?

दोन महिन्यांच्या काळात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या पाहता, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सर्वांचीच इमर्जन्सी कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सुविधेचा गैरफायदा घेऊन अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठीही काही जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने या सर्वांचे अर्ज अमान्य केले आहेत.

कसून तपासणीनंतरच दिला गेला पास

ई-पास देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात दिलेली कारणे खरेच अत्यावश्यक वाटणारी असतील आणि त्याअनुषंगाने संबंधित अर्जदाराने कागदपत्र जोडले असतील तरच तो पास मंजूर केला जातो. त्यामुळे विनाकारण पास घेऊन जिल्ह्याबाहेर फिरणाऱ्यांची संख्या घटली.