शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

हरभऱ्याला लागली मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार ...

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाथरी तालुक्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकाला चांगलाच फटका बसला होता. कापसाच्या उताऱ्यात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांची म्हणणे आहे, तर सोयाबीनला समाधानकारक उतारा आला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरीपातील नुकसानीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांचा आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु या पिकांवरही नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने, शेतकऱ्यांनी जवळपास ६ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पेरा केला आहे. हे पीक चांगले आले असताना, यावर आता बुरशी दिसून येऊ लागली आहे. या पिकाला सध्या घाटे लागले आहेत. अशातच याला मर रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील मंडळनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कासापुरी- १,१५६

हदगाव - ६८३

पाथरी - २,२३५

बाभळगाव १,८६८

‘‘रब्बीमध्ये हरभरा पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, आशा सूचना शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी दिल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर अतिवृष्टीने बुरशीचा फटका बसला आहे. १० टक्क्यांपर्यंत मर लागल्याचे दिसत आहे.

शिंदे, कृषी अधिकारी, पाथरी

‘‘सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याला घाटे लागले आहेत. या अवस्थेत हरभरा पिकाला ३० ते ४० टक्के मर लागली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल.

बाळासाहेब नावघरे, शेतकरी कासापुरी