शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याला लागली मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार ...

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाथरी तालुक्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकाला चांगलाच फटका बसला होता. कापसाच्या उताऱ्यात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांची म्हणणे आहे, तर सोयाबीनला समाधानकारक उतारा आला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरीपातील नुकसानीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांचा आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु या पिकांवरही नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने, शेतकऱ्यांनी जवळपास ६ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पेरा केला आहे. हे पीक चांगले आले असताना, यावर आता बुरशी दिसून येऊ लागली आहे. या पिकाला सध्या घाटे लागले आहेत. अशातच याला मर रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील मंडळनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कासापुरी- १,१५६

हदगाव - ६८३

पाथरी - २,२३५

बाभळगाव १,८६८

‘‘रब्बीमध्ये हरभरा पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, आशा सूचना शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी दिल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर अतिवृष्टीने बुरशीचा फटका बसला आहे. १० टक्क्यांपर्यंत मर लागल्याचे दिसत आहे.

शिंदे, कृषी अधिकारी, पाथरी

‘‘सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याला घाटे लागले आहेत. या अवस्थेत हरभरा पिकाला ३० ते ४० टक्के मर लागली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल.

बाळासाहेब नावघरे, शेतकरी कासापुरी