शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हरभऱ्याला लागली मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार ...

पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाथरी तालुक्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकाला चांगलाच फटका बसला होता. कापसाच्या उताऱ्यात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांची म्हणणे आहे, तर सोयाबीनला समाधानकारक उतारा आला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरीपातील नुकसानीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांचा आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु या पिकांवरही नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने, शेतकऱ्यांनी जवळपास ६ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पेरा केला आहे. हे पीक चांगले आले असताना, यावर आता बुरशी दिसून येऊ लागली आहे. या पिकाला सध्या घाटे लागले आहेत. अशातच याला मर रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील मंडळनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कासापुरी- १,१५६

हदगाव - ६८३

पाथरी - २,२३५

बाभळगाव १,८६८

‘‘रब्बीमध्ये हरभरा पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, आशा सूचना शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी दिल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर अतिवृष्टीने बुरशीचा फटका बसला आहे. १० टक्क्यांपर्यंत मर लागल्याचे दिसत आहे.

शिंदे, कृषी अधिकारी, पाथरी

‘‘सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याला घाटे लागले आहेत. या अवस्थेत हरभरा पिकाला ३० ते ४० टक्के मर लागली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल.

बाळासाहेब नावघरे, शेतकरी कासापुरी