शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

डोंगरतळा गावात तलाव फुटल्याने हाहाकार; अनेकांच्या घरात घुसले पाणी, शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:33 IST

rain in parabhani : प्रशासनाने तातडीने मदत केल्याने अनर्थ टळला

जिंतूर :- तालुक्यातील डोंगरतळा येथे गावालगत असणाऱ्या गाव तलावाची पाणी पातळी अचानक वाढल्याने तलावाची पाणी गावात घुसले. परिणामी गावातील 25 ते 30 घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी इतरत्र वळवले आणि मोठा अनर्थ टळला

तालुक्यातील डोंगर तळा या गावालगत लघुसिंचन विभागाचा पन्नास वर्षे जुना असा गाव तलाव आहे या गाव तलावांमध्ये बारमाही पाणी साठा असतो यावर्षी झालेल्या अति पावसामुळे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तलावाची पाणी गावात घुसण्यास सुरुवात झाली पाहता पाहता पाण्याचा वेग वाढल्याने गावातील 25 ते 30 घराचे तलावाचे पाणी घुसले अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. या संदर्भातली माहिती तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी, तलाठी नितीन बुड्डे, ग्रामसेविका भाग्यश्री बेले यांच्यासह प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली.

तोपर्यंत गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले होते. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाणी इतरत्र काढून दिले. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान, गावांमधील आणि घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य, धान्य, शेती उपयोगी अवजारे आदींचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

तातडीने पंचनाम्याची मागणीगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासंदर्भात प्रशासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी सरपंच कुंडलिक जवादे यांनी केली आहे

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानगावात पाणी आलेच, यासोबत 100 एकरपेक्षा जास्त शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे - गजानन पायगन, गावकरी डोंगरतळा

प्रशासनाची तत्परता, कायम स्वरूपी उपाय गरजेचायासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून डोंगरतळा गावात पाणी घुसले याचे प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सखाराम मांडवगडे व त्यांचे पथक यांनी तातडीने डोंगरकडा या गावाला भेट देऊन त्या ठिकाणी तळ्यातील गावात येणारे पाणी इतरत्र जेसीबीच्या साह्याने काढून काढून दिले दरम्यान ही तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी सध्याची परिस्थिती पाहता रात्री-बेरात्री पाण्याचा प्रवाह गावकऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो यावर आता कायमस्वरूपी सिंचन विभागाने पर्याय काढणे गरजेचे आहे तसेच या तलावाची पाणी पातळी वाढविण्यासाठी गाळ काढणे ही अत्यंत महत्त्वाची आहे

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती