शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

डोंगरतळा गावात तलाव फुटल्याने हाहाकार; अनेकांच्या घरात घुसले पाणी, शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:33 IST

rain in parabhani : प्रशासनाने तातडीने मदत केल्याने अनर्थ टळला

जिंतूर :- तालुक्यातील डोंगरतळा येथे गावालगत असणाऱ्या गाव तलावाची पाणी पातळी अचानक वाढल्याने तलावाची पाणी गावात घुसले. परिणामी गावातील 25 ते 30 घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी इतरत्र वळवले आणि मोठा अनर्थ टळला

तालुक्यातील डोंगर तळा या गावालगत लघुसिंचन विभागाचा पन्नास वर्षे जुना असा गाव तलाव आहे या गाव तलावांमध्ये बारमाही पाणी साठा असतो यावर्षी झालेल्या अति पावसामुळे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तलावाची पाणी गावात घुसण्यास सुरुवात झाली पाहता पाहता पाण्याचा वेग वाढल्याने गावातील 25 ते 30 घराचे तलावाचे पाणी घुसले अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. या संदर्भातली माहिती तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी, तलाठी नितीन बुड्डे, ग्रामसेविका भाग्यश्री बेले यांच्यासह प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली.

तोपर्यंत गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले होते. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाणी इतरत्र काढून दिले. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान, गावांमधील आणि घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य, धान्य, शेती उपयोगी अवजारे आदींचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

तातडीने पंचनाम्याची मागणीगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासंदर्भात प्रशासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी सरपंच कुंडलिक जवादे यांनी केली आहे

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानगावात पाणी आलेच, यासोबत 100 एकरपेक्षा जास्त शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे - गजानन पायगन, गावकरी डोंगरतळा

प्रशासनाची तत्परता, कायम स्वरूपी उपाय गरजेचायासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून डोंगरतळा गावात पाणी घुसले याचे प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सखाराम मांडवगडे व त्यांचे पथक यांनी तातडीने डोंगरकडा या गावाला भेट देऊन त्या ठिकाणी तळ्यातील गावात येणारे पाणी इतरत्र जेसीबीच्या साह्याने काढून काढून दिले दरम्यान ही तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी सध्याची परिस्थिती पाहता रात्री-बेरात्री पाण्याचा प्रवाह गावकऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो यावर आता कायमस्वरूपी सिंचन विभागाने पर्याय काढणे गरजेचे आहे तसेच या तलावाची पाणी पातळी वाढविण्यासाठी गाळ काढणे ही अत्यंत महत्त्वाची आहे

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती