शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली. तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून ओरड वाढली. त्यानंतर परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तूर खरेदीची गती अतिशय कमी होती. १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ४९७३८.५० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १७ हजार १३९ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ३ हजार २३२ शेतकºयांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १९ टक्के शेतकºयांची तूर खरेदी करणे झाले असून, ८१ टक्के शेतकºयांची तूर येत्या तीन दिवसांत खरेदी करावी लागणार आहे.जिंतुरात सर्वाधिक खरेदीजिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रापैकी जिंतूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर सर्वाधिक १०८२१ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. सेलू येथील खरेदी केंद्रावर १०५७६ क्विंटल, गंगाखेड ८१२९.५० पूर्णा- ७७६९.५०, बोरी- ७२१६.५० आणि परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५२२६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.मुदतीत खरेदीसाठी वाढविले काटेजिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व तूर उत्पादकांची तूर खरेदी करण्यासाठी मार्केटींग फेडरेशनने प्रत्येक खरेदी केंद्रावर २ काटे वाढविले आहेत. तर परभणी येथील खरेदी केंद्रावर आठ ते दहा काट्यांच्या साह्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी दिवसाकाठी १२०० ते १३०० क्विंटल तुरीची खरेदी होत होती. काटे वाढविल्यामुळे सुमारे अडीच हजार क्विंटल तुरीची खरेदी दररोज होत असल्याची माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. असे असले तरी मुदतीत सर्व तूर खरेदी होणे अशक्य असल्याने खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.मुदत संपत आली तरी अर्ध्याहून अधिक शेतकºयांची तूर खरेदी बाकी असल्याने शेतकºयांतही चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने सर्व शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.तुरीसह जिल्ह्यात हरभºयाचीही खरेदी हमीभावाने केली जाणार आहे़ यासाठी राज्य शासनाने हमीभाव खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही़ हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील १ हजार ८८४ शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ जिल्ह्यात ६ हमीभाव खरेदी केंद्र असून, त्यापैकी परभणी, गंगाखेड आणि बोरी हे तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. तर सेलू येथील खरेदी केंद्रावर २७७ क्विंटल, पूर्णा २०१़५० क्विंटल आणि जिंतूर येथील खरेदी केंद्रावर १३ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ परभणी तालुक्यात ७८७, जिंतूर ८५, सेलू ५४५ आणि पूर्णा ४६७ शेतकºयांनी हरभºयाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार