शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली. तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून ओरड वाढली. त्यानंतर परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तूर खरेदीची गती अतिशय कमी होती. १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ४९७३८.५० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १७ हजार १३९ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ३ हजार २३२ शेतकºयांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १९ टक्के शेतकºयांची तूर खरेदी करणे झाले असून, ८१ टक्के शेतकºयांची तूर येत्या तीन दिवसांत खरेदी करावी लागणार आहे.जिंतुरात सर्वाधिक खरेदीजिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रापैकी जिंतूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर सर्वाधिक १०८२१ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. सेलू येथील खरेदी केंद्रावर १०५७६ क्विंटल, गंगाखेड ८१२९.५० पूर्णा- ७७६९.५०, बोरी- ७२१६.५० आणि परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५२२६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.मुदतीत खरेदीसाठी वाढविले काटेजिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व तूर उत्पादकांची तूर खरेदी करण्यासाठी मार्केटींग फेडरेशनने प्रत्येक खरेदी केंद्रावर २ काटे वाढविले आहेत. तर परभणी येथील खरेदी केंद्रावर आठ ते दहा काट्यांच्या साह्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी दिवसाकाठी १२०० ते १३०० क्विंटल तुरीची खरेदी होत होती. काटे वाढविल्यामुळे सुमारे अडीच हजार क्विंटल तुरीची खरेदी दररोज होत असल्याची माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. असे असले तरी मुदतीत सर्व तूर खरेदी होणे अशक्य असल्याने खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.मुदत संपत आली तरी अर्ध्याहून अधिक शेतकºयांची तूर खरेदी बाकी असल्याने शेतकºयांतही चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने सर्व शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.तुरीसह जिल्ह्यात हरभºयाचीही खरेदी हमीभावाने केली जाणार आहे़ यासाठी राज्य शासनाने हमीभाव खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही़ हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील १ हजार ८८४ शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ जिल्ह्यात ६ हमीभाव खरेदी केंद्र असून, त्यापैकी परभणी, गंगाखेड आणि बोरी हे तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. तर सेलू येथील खरेदी केंद्रावर २७७ क्विंटल, पूर्णा २०१़५० क्विंटल आणि जिंतूर येथील खरेदी केंद्रावर १३ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ परभणी तालुक्यात ७८७, जिंतूर ८५, सेलू ५४५ आणि पूर्णा ४६७ शेतकºयांनी हरभºयाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार