शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, मनोज जरांगे यांचा इशारा

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 22, 2023 15:24 IST

नोटीसा देत आंदोलनाची धार कमी करण्याचा सरकारकडून निष्फळ प्रयत्न: मनोज जरांगे

सेलू (जि.परभणी ) : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांना सरकार, प्रशासनाकडून नोटीसा देण्यात येत आहे. आंदोलनाची धार कमी करण्याचा हा प्रयत्न असला तरीही यांचा मराठा समाज बांधवांवर काहीच परिणाम होणार नाही. उलट दुप्पट लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या भानगडीत सरकारने पडू नये, असा विनंती वजा इशारा  मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सेलूत पत्रपरिषद दिला. नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेपुर्वी ते मुक्कामी असलेल्या एका मंगल कार्यालयात सकाळी  पञकारांशी बोलत होते.

राज्यातील विविध भागात मराठयांच्या ५४ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याची वस्तुस्थिती असून ती मराठयांना मागास ठरविण्यासाठी पुरेशी आहे. मराठयांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास कोणीही आडवू शकत नाही. त्या कागदावरील चारही मुद्यावर आम्ही ठाम आहोत. सगे सोयरे हा शब्द तज्ज्ञ समितीने टाकला आहे. दोन महिन्यांपूवी उपोषण सोडण्यासाठी सरकारी प्रतिनिधी, तज्ज्ञ समितीने लिहून दिलेले ते चारही शब्दांची सरकारने दोन दिवसात पूर्तता करावी. यावेळी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना आरक्षणाच्या मुद्दय़ावर ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा तरुणांना नोटीसा देण्यावर भर दिला आहे. एक प्रयोग केला दुसरा करु नये. नोटीस बजावून नुसती छाती बडवून तुम्हाला काय हुशारी दाखवाची?  गैरसमजातून सरकारने बाहेर यावे. असे  जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केले. 

'त्या' कागदावरील चारही मूद्द्यावर ठामदोन महिन्यापूर्वी  उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधीसह तज्ज्ञ शिष्टमंडळाने लिहून दिलेले चारही शब्द आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामूळे त्यांनी लिहून दिलेल्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलन सूरूच राहणार असून दोन महिन्यापूर्वी सरकारने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये चार शब्द लिहिलेले आहेत. यातील एक शब्द मी २४ डिसेंबरल पुढील दिशा ठरवतांना जाहिर करणार आहे. १९६७ च्या नोंदीनूसार त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सर्व रक्ताचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असे सरकार कडूनच मला लेखी देण्यात आले आहे. मात्र,२१ डिसेंबरला सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले मंत्री गिरिष महाजन, उदय सावंत, संदिपान भूमरे यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र, यातील जास्तीत जास्त वेळ सगेसोयरे या एका शब्दावर चर्चा होवून देखील शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून माझे समाधान झाले नाही. त्यामूळे शासनाने मला जे लिहून दिले तेच मी मागत आहे. त्या भूमिकेवर मी  ठाम राहणार असल्याची ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना बोलतांना दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी