शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

हारतुरे स्वीकारण्यास गुंतलेल्या शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास वेळ नाही: राजू शेट्टी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 13, 2022 15:04 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची शिंदे सरकारवर बोचरी टीका

परभणी : राज्यातील शेतकरी अस्मानीसह सुलतानी संकटात सापडले आहे. पीक नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सुद्धा हे सरकार सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच अधिक गुंतले असल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ कुठे आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणीत केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता, तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत परभणी जिल्ह्यातील केवळ आठ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आल्याची स्थिती आहे. उर्वरित मंडळात नुकसान होऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी नुकसानभ रपाईपासून वंचित असल्याची जिल्ह्यात स्थिती आहेत. राज्यातील बहुतांश भागातही अशीच स्थिती आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला याबाबत काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आजही गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. हे सरकार स्थापनेपासून फक्त सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच मग आहे. यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळच कुठे आहे, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री स्वागत, सत्कारात मग्न शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून केवळ सत्कार समारंभात मग्न असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या आमदारांकडे सत्कार, स्वागताच्या कार्यक्रमास अधिक हजेरी लागत असल्याची स्थिती आहे. राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुद्धा त्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच सकारात्मक निर्णय होत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :parabhaniपरभणीRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी