शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

हारतुरे स्वीकारण्यास गुंतलेल्या शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास वेळ नाही: राजू शेट्टी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 13, 2022 15:04 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची शिंदे सरकारवर बोचरी टीका

परभणी : राज्यातील शेतकरी अस्मानीसह सुलतानी संकटात सापडले आहे. पीक नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सुद्धा हे सरकार सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच अधिक गुंतले असल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ कुठे आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणीत केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता, तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत परभणी जिल्ह्यातील केवळ आठ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आल्याची स्थिती आहे. उर्वरित मंडळात नुकसान होऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी नुकसानभ रपाईपासून वंचित असल्याची जिल्ह्यात स्थिती आहेत. राज्यातील बहुतांश भागातही अशीच स्थिती आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला याबाबत काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आजही गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. हे सरकार स्थापनेपासून फक्त सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच मग आहे. यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळच कुठे आहे, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री स्वागत, सत्कारात मग्न शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून केवळ सत्कार समारंभात मग्न असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या आमदारांकडे सत्कार, स्वागताच्या कार्यक्रमास अधिक हजेरी लागत असल्याची स्थिती आहे. राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुद्धा त्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच सकारात्मक निर्णय होत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :parabhaniपरभणीRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी