शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आहारात ...

शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आहारात हवे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर महिला, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्षे आणि ३ ते ६ वर्ष वयोगटांतील लाभार्थ्यांना पूरक पोषण आहर योजनेंतर्गत पोषण आहार देण्यात येतो. २२ जानेवारी २०२१ रोजी राज्य शासनाने एक आदेश काढून यासंदर्भात देण्यात येणाऱ्या साहित्यातील तेलाऐवजी साखर लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सर्वत्र सुरू झाली आहे; परंतु तेलाला साखर पर्याय कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय-काय मिळते

पोषण आहारामध्ये दर महिन्याला या लाभार्थ्यांना चणा किंवा चवळी, मूग किंवा मसूर दाळ, गहू, हळद, मिरची पावडर, मीठ, तेल असे साहित्य देण्यात येते.

राज्य शासनाने यामध्ये आता बदल केला असून तेलाऐवजी साखर लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पोषण आहार तयार करताना फोडणी कशी द्यावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिकारी म्हणतात...

परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने गरोदर महिला, स्तनदा माता आणि ६ महिने ते ३ वर्षे व ३ ते ६ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण आहार देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तेलाऐवजी साखर लाभार्थ्यांना देण्याचा वरिष्ठांचा आदेश आला. या आदेशानुसार लाभार्थ्यांना साखर वितरीत करण्यात येत आहे. शासन आदेशाची परिपूर्ण अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे.

- कैलास घोडके, उपमुख्य कायर्यकारी अधिकारी

सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. अशात शासनाने लाभार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी संकट काळात वाऱ्यावर सोडून दिले आहे. आहार तयार करताना फोडणी कशी द्यायची ते शासनानेच सांगावे?

- सखूबाई काळे

शासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. तेलाला साखर कसा पर्याय असू शकतो? तेल नसेल तर पोषण आहार तयार कसा करावा? लाभार्थ्यांच्या हितासाठी शासनाने हा निर्णय मागे घ्यावा.

- गीताताई कदम

शासनाने ज्या उद्देशाने पोषण आहार गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे उद्देशाला यामुळे तडा गेला आहे. लाभार्थ्यांचा विचार न करताच हा निर्णय घेतला गेला आहे.

- गणेश मोहिते